लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यापासून काँग्रेसच्या मागे आयकर विभागाने सातत्याने नोटीसींचा सिलसिला सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने १४ लाख रूपयांसाठी ११० पट्टीत दंडाची रक्कम ठोठावत काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठावली. त्यानंतर गेल्यावर्षीच्या टॅक्स रिटर्नमधील तफावतीवरून १ हजार ८२३ कोटी रूपयांची काँग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या नोटीशीची माहिती …
Read More »वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार
देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्दची कारवाई राजकीय द्वेषातून
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन, …लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज
लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, …
Read More »शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी
जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरु होती. या चर्चेत काही काळ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही सहभागी झाली. मात्र वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडणे …
Read More »वंचितच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले, आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …
Read More »सेव्हन हिल्सवर महानगरपालिकेचा महिन्याला ९ कोटी खर्च तर दरमहा ४ कोटींचे नुकसान
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे, सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेनेचे चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. २०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दरमहिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. महापालिकेला महिन्याला …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला आहे. कंगना रणौतने काँग्रेस नेत्याला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की लोकांनी “लैंगिक कार्यकर्त्यांचे आव्हानात्मक जीवन किंवा परिस्थिती एखाद्या प्रकारचे गैरवर्तन किंवा अपमान म्हणून वापरणे टाळावे” असा खोचक टोला लगावला. हिमाचल प्रदेशच्या मंडीतून कंगना राणौतला …
Read More »काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांच्या तीन नावांची ५वी यादी जाहिर
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली पाचवी यादी जाहिर केली आहे. या यादीत चंद्रपूरच्या जागेसाठी एक आणि राजस्थानातील दोन अशा एकूण तीन उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहिर केली. २०१९ ला मोदी लाटतेही काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभत करत काँग्रेसची जागा परत मिळवून दाखविली. तसेच त्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya