Tag Archives: congress

सीमा बंद, महिलांनी १०० नंबरवर कॉल करावा आणि कामगारांनो तुम्ही घरी पोहोचाल लॉकडाऊनमुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात उद्यापासून अर्थात २० एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करत लॉकडाऊन काळात ज्या महिलांना कौटुंबिक हिसांचाराला तोंड द्यावे लागत आहे, त्या महिलांनी १०० नंबरला …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्यांमध्ये सुरू होणार रोटेशन पध्दतीने कर्मचाऱी-अधिकारी उपस्थित राहून काम करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्या ३ मे पर्यत वाढविण्यात आलेला असला तरी केंद्र सरकारने ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकिय कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्ती राज्यातील शासकिय कामकाज आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयासह विभागीय मुख्यालये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून २० …

Read More »

वाधवानला पत्र देण्यामागे भाजपातील बडा नेता? अमिताभ गुप्ता पत्रामागेही मास्टरमाईंड असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शहरातील गोरेगावातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातील वाधवान बिल्डरला वाचविण्यासाठी भाजपातील एका बड्या नेत्याने चार वर्षे सातत्याने पाठीशी घालत त्याला क्लीनचीट दिली. विशेष म्हणजे या वाधवानला वाचविण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यावर कारण नसताना निलंबित करण्याचा प्रकार या नेत्याने केला. त्याच नेत्याने आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्याकडून  वाधवान यांना पत्र उपलब्ध करून …

Read More »

काँग्रेसची टास्कफोर्स राज्य सरकारला आभासी मदत करणार कोरोना विरोधी लढाईसाठी COVID-19 टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स व विविध …

Read More »

काँग्रेस अध्यक्षा पंतप्रधानांना म्हणाल्या, आम्ही सोबत पण हे सल्ले अंमलात आणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षिय नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधानांनी काय करावे याबाबतचे पाच कलमी सल्ले देत त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोबत असल्याची …

Read More »

राज्य सरकारच्या आवाहनाला भाजपाचा प्रतिसाद भाजपातर्फे सेवाकार्य अभियानातंर्गत १ लाख २५ हजार कार्यकर्त्ये कामाला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना आजार संकटाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी एकजूट दाखवित एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या आवाहनाला प्रदेश भाजपाने सकारात्मक प्रतिसाद असून राज्यातील गरजू लोकांना जेवण, त्यांना दैनंदिन वस्तुंचा पुरवठा, रक्तदान शिबीरे आदी गोष्टींसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह आमदार ते सरपंचापर्यंतच्या सर्वांना फक्त ४० टक्के वेतन तर सरकारी कर्मचाऱ्यांचे २५ ते ५० टक्के वेतन कपात करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ लॉकडाऊनची लक्षणे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम म्हणून मुंख्यमंत्र्यांसह, आमदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यापासून ते सरपंचापर्यंत मिळणाऱ्या वेतनात ६० टक्के तर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. …

Read More »

राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यानों, “हीच ती वेळ, करुन दाखविण्याची” ज्येष्ठ राजकिय पत्रकार योगेश त्रिवेदी यांचा खास लेख

लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा तसेच शिक्षक, पदवीधर आदी निवडणुकीत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मतदारांची मतदानासाठी घरोघरी जाऊन विनवणी करतात, मिनतवाऱ्या करतात. मतदार हा तेंव्हा राजा असतो आणि तो आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्यातील जनतेला कोरोना आजाराच्या …

Read More »

पंतप्रधानाचे आवाहन, २२ मार्चला घराबाहेर पडू नका जनता कर्फ्यु लागू राहणार

नवी दिल्लीः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाला रोखण्यासाठी २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. यादिवशी नागरीकांनी सकाळी ७ ते रात्रो ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जनतेला उद्देशून केलेल्या भाषणा दरम्यान त्यांनी वरील आवाहन केले. त्याचबरोबर त्यादिवशी …

Read More »

कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत …

Read More »