देशात आणि राज्यात वारंवार काँग्रेसची सत्ता येत असताना काँग्रेसेतर पक्षांना मिळणारी मते आणि त्यांना मिळणाऱ्या निवडणूकीतील जागांमुळे असं म्हटलं जायचं कि, लोकशाहीत जर सर्व काँग्रेस विरोधी पक्ष आले तर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही आणि विरोधकच वर्षानुवर्षे सत्तेत राहीतील. या म्हणण्यातील सत्यता महाराष्ट्रात उतरली. परंतु ती काँग्रेसबाबतीत नाही तर काँग्रेसचा …
Read More »खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …
Read More »खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार भाजपा आ. अतुल भातखळकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या दोघांना उमेदवारी आणखी दोन जागांवरील उमेदवार नंतर जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत.नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक …
Read More »आरेच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प २० हेक्टरऐवजी ६१ हेक्टर जागेत का केला जात होता? भाजपाला सवाल
मुंबई : प्रतिनिधी मेट्रो कार शेडसाठी आरेची जागा ही फडणवीस सरकारने केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातूनच निवडली होती. कांजूरमार्ग जागेचा प्रस्ताव जाणीवपूर्वक बारगळू दिला. कांजूरमार्गची जागा घेण्याकरीता खाजगी व्यक्तीला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील हा खोटारडेपणा केला गेला हे आता सिद्ध झालेले आहे. आरे कॉलनीतील मेट्रो प्रकल्प २० हेक्टरमध्ये करणे बंधनकारक …
Read More »शेलार म्हणाले, सचिन सावंत यांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार! आरेतील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला !
मुंबई: प्रतिनिधी आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला. काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत …
Read More »पाच हजार कोटी रुपये द्यावी लागण्याची फडणवीसांची माहिती खोटी भाजपाच्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल
मुंबईः प्रतिनिधी भाजपा आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहिले तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कार शेड कांजूरमार्गला करण्याचा प्लॅन फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद …
Read More »त्या चार महिन्यातील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णयाची शक्यता डॉ. नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सोमवारी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या एका …
Read More »सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …
Read More »११ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु: जॉंईनींगसाठी या संकेतस्थळावर नाव नोंदवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत असले तरी शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले. त्याचधर्तीवर आता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत शिक्षण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या …
Read More »
Marathi e-Batmya