भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्याच, उच्चस्तरीय चौकशी करा डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का, ते कोणाला व का वाचवत आहेत
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी राजकीय दबाव, ब्लॅकमेलिंग व त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाजपाचा माजी खासदार, प्रशासन व पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून तीला आयुष्य संपवावे लागले. पण ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआय, एसआयटी अथवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »राहुल गांधी यांचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन-हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …
Read More »राहुल गांधी यांची टीका, नरेंद्र मोदींना मतांसाठी नाचायला सांगितले तर नाचतील नितीश कुमार यांच्या मुखवट्यामागे भाजपा
बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्भयपणे हल्ला चढवला आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले तर ते स्टेजवर नाचतील, असा उपरोधिक टोलाही यावेळी सांगितले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही फसवेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा …
Read More »इंडिया ब्लॉक जाहिर केला बिहार निवडणूकीचा जाहिरनामा तेजस्वी यादव, तुषार गांधी आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत जाहिरनामा प्रसिद्ध
इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …
Read More »काँग्रेससह विरोधकांचा आरोप, मतचोरीचा नवा फंडा १२ राज्यात एसआयआर बिहारनंतर आता आता १२ राज्यात खेळ
काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगावर मोदी सरकारशी संगनमत करून मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) अंतर्गत १२ राज्यांमध्ये “मत चोरीचा खेळ” राबवल्याचा आरोप केला. पक्षाने आरोप केला की बिहारच्या सुधारणेच्या मोहिमेनंतर, ज्यामध्ये ६९ लाख नावे वगळण्यात आली होती, आता तीच “मतदार फेरफार करण्याची पद्धत” देशभरात पसरवली जात आहे. एक्स X वर …
Read More »सचिन सावंत यांचा टोला, केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली ? अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीला सीबीआयला ५ वर्षे लागली; पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार?
भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस …
Read More »
Marathi e-Batmya