Tag Archives: congress

सचिन सावंत यांचा आरोप, भाजपाने अस्मितांशी खेळत कार्पोरेट हिदूत्वाचा खेळ मांडला छत्रपती शिवाजी महाराज ‘कोटक’चे कधी झाले? सिद्धिविनायक ‘लोंबार्ड’ला विकला तर आचार्य अत्रेंचे निप्पॉन इंडिया एमएफ नामकरण!

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकऱ्यांची दिवाळी काळी, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं तरी दिलेली मदत ही तुटपुंजी

राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …

Read More »

ओबीसींना ४२ टक्के आरक्षण, उच्च न्यायालयाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली तेलंगणा सरकारच्या आदेशाच्या विरोधातील न्यायालयाचा निकाल कायम

नगरपालिका आणि पंचायतींमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण ४२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देणाऱ्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली [तेलंगणा राज्य विरुद्ध बुट्टेमगरी माधव रेड्डी]. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी घेतलेल्या राज्याच्या या निर्णयामुळे एकूण आरक्षण (ओबीसी, एससी, एसटी इत्यादी) ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा, सर्वसामन्यांच्या घरांकडे मात्र दुर्लक्ष

मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची खोचक मागणी, महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी गुंडांना वेळेत शस्त्र परवाने मिळावे म्हणून विशेष काऊंटरची व्यवस्था करावी

अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज

मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पंतप्रधानांनी भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!

महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात  विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …

Read More »