मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती
सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा चेटकीण; दुसऱ्या पक्षातील नेते खाण्याचा रोग दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री; Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या
भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्ष चेटकीण आसाहे, तीला दुसऱ्या पक्षातील लोक …
Read More »राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका वाचण्याचे निर्देश राहुल गांधी यांना द्यावे म्हणून याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून लावली ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल “अपरिपक्व” टिप्पणी करून याचिकाकर्त्याच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडवणीस यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांना विनायक दामोदर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा
अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. तसेच त्यांच्या तोंडाला आणि अंगावर शाई टाकण्यात आली. त्या विषयीचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी एका जागेवरच अटक केली. सध्या सर्व …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करा सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस …
Read More »इम्रान प्रतापगढी यांचा इशारा, भाजपा युतीचे सरकार चोरीचे, काँग्रेस पक्ष मुंबईला लुटू देणार नाही मुंबई काँग्रेस आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेला मोठा प्रतिसाद
महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल गांधी यांनी या मतचोरीचा जाब निवडणूक आयोगाला विचारला पण अद्याप आयोगाने उत्तर दिले नाही. विधानसभेची निवडणूक पराभूत झालो याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, अदानीसाठी रथयात्रा थांबविण्यात आली समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द कायद्यातून काढून टाकण्याची योजना
ओडिशातील भाजपा सरकार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की गेल्या महिन्यात भारतीय अब्जाधीश आणि त्यांच्या कुटुंबासाठी जगन्नाथ यात्रा रथ थांबवण्यात आले होते. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “जेव्हा ओडिशात जगन्नाथ यात्रा काढली जाते, तेव्हा रथ (रथ) ओढले …
Read More »
Marathi e-Batmya