राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी …
Read More »समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी अखेर विधानसभेतून निलंबित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी हे निलंबन कायम राहणार
मुघल शासक औरंगजेबाच्या उद्दातीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना सध्या सुरू असेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी विधानसभा सदस्यत्व निलंबित केले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च रोजी संपेल. दोन दिवसांपूर्वी आझमी यांनी औरंगजेबाचे वर्णन एक उत्कृष्ट प्रशासक असे केले होते; या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण …
Read More »नाना पटोले यांचे आव्हान, … कोरटकर व सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा भाजपाच्या मूळ विचारसरणीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान
भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा …
Read More »वाघ-बिबट्यांचे हल्ले, गावांना साळखी कुंपण घालण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी साखळी कुंपनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी …
Read More »अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर …
Read More »पाण्यातील नायट्रेट पातळीत वाढः प्रश्नच समजेना, वाद मात्र गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांच्या प्रश्नावरून मंत्री-अध्यक्ष संभ्रमात
राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेट-नायट्रोझनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार त्या पाण्याला फिल्टर करणार की नव्याने फिल्टर बसविणार असा सवाल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत यासंदर्भात जी पाच प्रश्न मी उपस्थित …
Read More »आमदार अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाची नोटीस तेलंगणातील बीआरएसच्या सात आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय़
बीआरएस तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या परंतु सत्ताधारी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या सात आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी विलंब केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तेलंगणा सरकार आणि इतरांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीआर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने राज्य सरकार, …
Read More »महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार मुख्यमंत्री फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी सत्तेवरचा नैतिक अधिकार गमावला तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या!
स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. …
Read More »
Marathi e-Batmya