Tag Archives: covid-19

कामगारांसाठी जास्तीच्या रेल्वे सोडणार मात्र जीवावर उदार नका होवू मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या मृत मजुरांच्या कुटुंबियांना ५ लाख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश देत परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी …

Read More »

कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …

Read More »

सोलापूरात आज २९ रूग्ण सापडले ११ वा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतच आहे. कालपर्यंत ७ आणि ८, ३ अशा स्वरूपात कोरोनाग्रस्त रूग्ण सापडत होते. मात्र आझ एकदम २९ रूग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण आकाशवाणी केंद्र परिसरातील असून …

Read More »

गल्लाभरू डॉक्टरांपासून स्थलांतरीत कामगारांची सुटका प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत करण्याची राज्य सरकारची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांकडून घेण्याची अट राज्य सरकारने घेतली. मात्र या निर्णयाचा गैरफायदा काही गल्लाभरू डॉक्टरांनी घेण्यास सुरुवात करत अव्वाच्या सव्वा रक्कम आकरण्यास सुरुवात केल्याने या कामगारांना आणखीनच अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू …

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू , जबाबदार कोण? मंत्री कार्यालय कि गुच्छ अधिकाऱ्यांमधल्या नेत्याप्रती निष्ठा आणि स्पर्धेचा पहिला बळी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील जनता कोरोना आजारावर विजय मिळण्यासाठी राज्य सरकारला साथ देत आहे. तर दुसऱ्याबाजूला मर्जीतील व्यक्तींची खास पदावर नियुक्ती करण्याच्या आणि नियुक्तीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्याच्या पध्दतीमुळे एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुख:द घटना पुणे येथे घडली. त्यामुळे मंत्रालय आणि इतर शासकिय अधिकाऱ्याकडून याबाबत हळहळ …

Read More »

२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा …

Read More »

राज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले. बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती …

Read More »

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …

Read More »

कोरोनाच्या नायनाटासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविले नॅनो कोटींग्ज मुंबई विद्यापीठ व स्वच्छ उर्जा अलाएन्सचे एकञित संशोधनातून अँटीव्हायरल नॅनो कोटींग्स तयार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका असून कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकिय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी …

Read More »