Tag Archives: deputy chief minister

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागतिक बँकेने सहकार्य करावे; तर फडणवीस-दुष्काळमुक्त करणार महाराष्ट्राच्या सादरीकरणाने जागतिक बँकेचे शिष्टमंडळ प्रभावित

जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री …

Read More »

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आता मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली शपथ

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी २९ जुलै झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी

नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, …

Read More »

अशोक चव्हाण यांचा सवाल, अहमदाबादसाठी १८ विमाने; राज्यांतर्गत फक्त १५ का? महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा सवाल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, शिर्डी विमानतळाचा विकास आणि लँडिंग कधी सुरु होणार? नव्या टर्मिनल सह नाईट लँडिंगची सुविधाही तातडीने सुरू करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

साई भक्तांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असूनही शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिर्डी विमानतळ अनेक संकटांचा सामना करत आहे. नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊन चार महिने उलटले तरीही ही सुविधा सुरू झालेली नाही याचं नेमकं कारण काय? असा सवाल …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आदिवासी, आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी कृती आराखडा वनविभागाची जमिन किंवा प्रसंगी राज्य सरकार जमिन खरेदी करणार

आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार …

Read More »

जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात उघड कृषीमंत्र्यांकडून आश्वासन; कंपन्यांना समज देणार

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, इर्शाळवाडीची दुर्घटना झाल्याने वाढदिवस साजरा करू नका मात्र ट्विटरवरून ताज हॉटेल येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा कऱण्याचे निमंत्रण

गतवर्षीच्या रायगड जिल्ह्यातील माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना इर्शाळवाडी येथे आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या ठाकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या दरड खाली अनेक घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवातहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, दरड कोसळून शेकडो लोक… वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता ? माधवराव गाडगीळ समितीची अंमलबजावणी आजपर्यंत का झाली नाही?

रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला दिसत नाही. इरसाळवाडी दुर्घटनेने …

Read More »