मागील काही दिवसांपासून कांदासह द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकरी उत्पादनाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ८०० किलो कांदा विकून अवघ्या २ रूपयांचा चेक मिळाला तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला खर्च वजा जाता एक रूपया जास्तीचा मोजावा लागला. यावरून कांदा उप्तादक, द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकऱ्यांचे होणारे हे …
Read More »सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक... जोरदार घोषणाबाजी...
सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा …
Read More »अजित पवारांनी साधला अप्रत्यक्ष विधानसभाध्यक्षांवर निशाणा, नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले… शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप
विधिमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहात केला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बऱ्याचवेळा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक झुकते माफ देण्यात येत …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पटोलेंनी दिला शिंदे-फडणवीस सरकारला हा इशारा शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी; ईडी सरकार शेतकरी विरोधी
राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला सभागृहात जाब विचारू व शेतकऱ्यांना …
Read More »पुरवणी मागण्यातील ६० टक्के निधी देवेंद्र फडणवीसांकडील खात्यांसाठी वित्तमंत्री फडणवीसांकडच्या वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा विभागांसह भाजपच्या सहकार ग्रामविकास विभागाला पुरवणी मागण्यामध्ये झुकते माप!
आगामी वर्षासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आणखी १० दिवसानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी ६ हजार ३८३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडल्या. मात्र निधी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्याकडील खात्यापेक्षा जवळपास ६० टक्के निधी उपमुख्यमंत्री …
Read More »पहिल्याच दिवशी फडणवीसांचा आरोप भास्कर जाधव धमकावतायत… फडणवीसांच्या आरोपावर भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर आमचा आवाजच तसा आहे
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आज राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर अभिभाषण केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मांडला त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं. मात्र ठाकरे गटाचे आमदार भास्कर …
Read More »अभिभाषणातून राज्यपाल रमेश बैस यांनी मांडली आपल्या सरकारची भूमिका, केल्या या मोठ्या घोषणा सीमावाद आग्रही भूमिका आणि नोकरभरतीवर भर
राज्य विधानमंडळाच्या, 2023 या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे सतत अनुसरण करीत आहे. …
Read More »सफाई कामगारांसाठी खुषखबरः लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार या गोष्टींचा मिळणार लाभ मालकी हक्काने घर, वारसांना नोकरी, शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार संधी
सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत …
Read More »एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …
Read More »अजित पवार यांची उपरोधिक टीका,…जर आम्ही गेलो असतो तर तो महाराष्ट्र द्रोह ठरला असता हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे... कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे
पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल करतानाच अशा …
Read More »
Marathi e-Batmya