अजित दादा म्हणाले हे खोके सरकार आहे हे स्थगिती सरकार आहे हे घटनाबाह्य सरकार आहे एकच सांगू इच्छितो हे सरकार पूर्णपणे या देशाची जी घटना आहे बाबासाहेबांनी दिली त्याप्रमाणे कायदेशीर बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन झालेल्या लोकांच्या जनमताच आदर राखून आणि सभागृहामध्ये मेजॉरिटी सिद्ध करून बहुमत सिद्ध करून हे सरकार स्थापन …
Read More »लोकायुक्त कायद्याच्या कक्षेवरून देवेंद्र फडणवीसांची झाली चलबिचल, मुख्यमंत्री तर गप्पच मुख्यमंत्री व मंत्रिमंडळावरही भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये दाखल होणार गुन्हे
अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकृत करत त्यानुसार राज्यात नवा लोकायुक्त कायदा राज्यात आणण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत या कायद्यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्णपणे या कायद्याच्या कक्षेखाली येणार असल्याचे जाहिर केले. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर एका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू …
Read More »अजित पवारांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे प्रतिउत्तर, महापुरूषांचे पुरावे मागतात आणि… विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकार परिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार …
Read More »अजित पवार म्हणाले, नाकाखालून नेलं, मग ते वेशभूषा बदलून जायचे ते काय होते? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची टोलेबाजी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून …
Read More »महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया
महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, …
Read More »संजय राऊत यांचे टीकास्त्र, त्यांची ताकद फक्त वागळे इस्टेट आणि पाचपाखडी पुरतीच.. त्यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज १७ डिसेंबर रोजी ठाणे बंदची हाक दिली. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडक पध्दतीने दिलगिरी व्यक्त केली जातेय सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या पक्षाला झालं तरी काय
महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …
Read More »संजय राऊत म्हणाले, त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे
महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जात आहे. भाजपाची काही नेतेमंडळी आणि खुद्द राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य, बसवराज बोम्मईंची आक्रमक भूमिका आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग यावरून सरकारविरोधी भावना व्यक्त होत आहे. त्यातच राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईच्या मुद्यावरही या …
Read More »आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेनी आधीच… देवेंद्र फडणवीसांनी आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्यानंतर दिली प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी आणि त्यानंतर भाजपा आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली. त्यावरून राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्यातच कर्नाटकचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय
विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प …
Read More »
Marathi e-Batmya