राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा निकाली सर्वोच्च न्यायालयाकडून निघण्याच्या उंबरठ्यावर असताना त्या पाठोपाठ शहरी आणि ग्रामीण भागातील निवडणूकांचे बिगुलही कधीही वाजण्याची शक्यता असताना या दोन्ही भागांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आज दोन योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान …
Read More »निवडणूकांच्या तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय: पेट्रोल ५ तर डिझेल ३ ने स्वस्त ६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर
एकाबाजूला राज्यातील ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्या वैधतेच्या प्रश्नाबाबतची याचिकाही न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची प्रक्रिया सध्या सुरु आहे. यापार्श्वभूमीवर आगामी जय-पराजयाची राजकिय गणिते मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांमध्ये झालेल्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलवरील …
Read More »माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ऊर्जा विभागाची बैठक पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा
देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमधील माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात राज्यात सौर ऊर्जा, शेतकऱ्यांना वाटप करण्याचे सौर ऊर्जेचे कृषी पंप यासह अन्य काही योजनांची सुरवात करण्यात आली होती. मात्र २०१९ च्या निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र ऊर्जा विभागाच्या अनेक निर्णयावर माजी ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर …
Read More »आता केंद्रीय यंत्रणांकडून थेट आदित्य ठाकरे टार्गेट आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मेट्रो-३ च्या आरेतील कार शेडवरून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आता शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील महाविकास आघाडीला घालवित भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणले. त्यानंतर पुन्हा एकदा आरेतच कारशेड करण्याचे …
Read More »शरद पवार यांचा खोचक टोला, सत्ता नसल्याने जे अस्वस्थ होते त्यांची आता… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला टोला
राज्यातील सत्तातंर नाट्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील काही काळ सत्ता नसल्याने जे कोणी अस्वस्थ होते. आता सत्ता आल्याने त्यांच्यातील अस्वस्थता कमी झाली असेल असा खोचक टोला …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला… दिड तास पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे अनं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा
शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा …
Read More »दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष्य मात्र मेळघाटातील बाधितांच्या मदतीकडे केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »अजित पवार यांचा टोला; युतीच्या काळात मानसन्मान मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदेनी… धास्तीने फक्त दोघांचा शपथविधी
राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर पहिल्यांदाच टीका करताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो की, मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. …
Read More »नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची मागणी
राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी मागणी करत भाजपाप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात तत्कालीन …
Read More »गडकरी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था महाराष्ट्राशिवाय पाच ट्रिलीअन डॉलरची होणार नाही मुंबई, महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात …
Read More »
Marathi e-Batmya