मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले. वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार
२०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, …
Read More »रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …
Read More »कर्मठ आणि अभ्यासू म्हणणारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा अमित शाह यांच्याकडूनच त्रिफाळा तिलक महाराज कोण, शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरु केली? अमित शाह यांना यांना अचूक माहिती द्या
फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी …
Read More »रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या …
Read More »थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार रशियाची रोसातोम आणि महाजेनको मध्ये सामंज्यस करार
थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको, रशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) च्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रकल्पाची …
Read More »अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती आयएएस अधिकाऱ्याकडून एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद काढून मंत्र्यांकडे सुपुर्द
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. …
Read More »ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पुढे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाने नागरिक सेवा अधिक प्रभावीपणे डिजिटल स्वरूपात पुरवण्याचा संकल्प केला आहे. शासन व नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रशासन अधिक जवळ आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पुढे …
Read More »
Marathi e-Batmya