मुंबई : प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यातील ज्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही त्यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका …
Read More »पनवेलकरांसाठी खुषखबर: रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे
मुंबई : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. …
Read More »मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सरनाईकांच्याबाबत हे सांगितले चांगल्या कामासाठी निधी मिळाला आहे येथून पुढेही मिळेल
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला आर्शिवाद द्या, आर्शिवाद द्या म्हणून कोणी देत नसते…. आंदोलन करायचे असेल तर सरकार विरोधात नव्हेतर कोरोना विरोधात करा-ऑक्सीजन प्लांटचा लोकार्पण सोहळा
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असा टोला भाजपाला लगावत हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. …
Read More »गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …
Read More »ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …
Read More »पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …
Read More »महानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय- यासह आणखी महत्वाचे निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर …
Read More »मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा …
Read More »दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही
महाड (तळीये) : प्रतिनिधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले. …
Read More »
Marathi e-Batmya