Tag Archives: eknath shinde

एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीचा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो

दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे; हरित ठाण्याची वाटचाल बंगळुरू विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर करणार

मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी …

Read More »

असीम सरोदे म्हणाले, शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार नाही उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवरील सुनावणी १२ नोव्हेंबर पासून सुरु होणार

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षाचे तुकडे झाले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्यास मोठा कालावधी निघुन गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरपासून सुणावनी सुरु …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा इशारा, विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा विरोधकांना इशारा

विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण …

Read More »

मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …

Read More »

एकनाथ शिंदे यांची टीका, कंबरडे मोडल्यावर हंबरडे फोडण्यात अर्थ नाही “माझ्या नादाला लागू नका, मी काम करणारा माणूस आहे” एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा

“नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीवासी रहिवाशांचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण करणार समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर

समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न …

Read More »

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थान आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित

आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »