Tag Archives: Harshwardhan Sapkal

राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना उबाठाला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर सोम्या गोम्याच्या धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार

पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू

देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी भाजपाकडून सातत्याने सैन्यांचा अपमान, मोदी व नड्डांनीच माफी मागावी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही, महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा

ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, खते, बि बियाण्यांचा पुरवठा मुबलक ठेवा, बोगस बियाणे, लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा

राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच काँग्रेस पक्ष संपण्याची भाषा करणाऱ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास माहित नाही

काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही,…तर काँग्रेस भाजपा विरोधात लढत राहिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला …

Read More »