सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …
Read More »जातीय जणगणनेची अखेर तारीख ठरली, केंद्र सरकारकडून अखेर अधिसूचना जाहिर दोन टप्प्यात होणार जनगणना
मागील वर्षी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार आणि भाजपाला ठणकावून सांगत आम्ही याच सभागृहात जातीय जणगणना करायला भाग पाडू असे आव्हान दिले. त्यानंतर अधिवेशानंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातीय जणगणना करणार असल्याची घोषणा केली. परंतु आता बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील …
Read More »राहुल गांधी यांची बसपा प्रमुख मायावती यांच्यावर टीका भाजपाविरोधात न लढण्याचे धोरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, एकतर त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगून किंवा भाजपाविरुद्ध लढण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. बसपाला इंडिया ब्लॉकमध्ये सामील करण्याच्या इच्छेपेक्षा राहुल गांधी यांचा संदेश दलित आणि त्यांचा मित्रपक्ष समाजवादी पक्ष (सपा) यांच्याकडे इशारा असल्याचे …
Read More »वक्फ विधेयकावरील विरोधकांच्या सूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांच्या सूचना मान्य समितीतील एनडीएच्या सूचना सांसदीय समितीने स्विकारल्या
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आणि कलम-दर-कलम चर्चेत विरोधी सदस्यांनी सुचवलेले प्रत्येक बदल फेटाळून लावले. मंजूर झालेल्या दुरुस्त्यांपैकी एक म्हणजे पॅनेलमधील गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या वाढवणे. आता, पॅनेल सदस्यांपैकी दोन गैर-मुस्लिम असू शकतात. प्रस्तावित केलेल्या …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन
राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »अमित शाह यांच्या डॉ आंबेडकरांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्यावरून संसद तहकूब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झालीय
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची …
Read More »वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर एनडीए सरकार दोन तृतीयांशी बहुमत? नियम काय विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठविणार
भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मोठ्या जोषात संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत आज सादर केले. मात्र या विधेयकाच्या निमित्ताने भाजपाच्या एनडीए सरकारच्या पाठिशी दोन तृतीयांशी बहुमत असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी तीव्र अक्षेपानंतरही, भाजपाने वन नेशन वन इलेक्शन अर्थात “एक राष्ट्र, …
Read More »संसदेत पुन्हा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभा आणि लोकसभेत कामकाज ठप्प
पहिल्या आठवड्यातील धुसफूसानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. तथापि, अदानी प्रकरणी आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज फारसे झाले नाही. तसेच विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे संसदेचे कामकाज करण्यात तहकूब करण्यात आले. आता मंगळवारी संसदेची पुन्हा बैठक होणार आहे. विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीत लोकसभेचे कामकाज …
Read More »ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ काँग्रेसचा अब्दुल्ला सरकारला बाहेरून पाठिंबा
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ओमर यांच्यासोबत इतर पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली. सुरिंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत शपथ घेतलेल्या पाच मंत्र्यांमध्ये एकमेव महिला सकीना इटू ही एकमेव महिलेचा समावेश करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya