Tag Archives: jayant patil

सैन्यदलाची मदत मिळणार: पालकमंत्री, लोकप्रतिनिधींनो जिल्हा सोडू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि सूचना

मुंबई : प्रतिनिधी रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त योजनाच काँग्रेस ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कॅगनंतर चौकशी समितीचेही शिक्कामोर्तब

मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने …

Read More »

…विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला

सातारा : प्रतिनिधी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिली. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी …

Read More »

शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून बसले भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प …

Read More »

फडणवीस, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ फोन टॅपींगप्रकरणी चौकशी समितीची राज्य सरकारकडून स्थापना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात राजकिय नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शिवसेनेच्या आमदाराने पावसाळी अधिवेशनात केल्यानंतर यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. त्यानुसार राज्याचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षखाली एका समितीची स्थापना आज करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री …

Read More »

…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय… तुम्ही पुढे या… म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला… विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंतराव पाटील यांनी फोटोही काढले हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, हे तर एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपाचे कुंभाड राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय-जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने …

Read More »

भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभा करणार कारवाई उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी ओबीसी प्रश्नी गोंधळ झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजावर भाजपाने बहिष्कार टाकला. त्यानंतर आज सकाळी भाजपा सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता विधानभवनाच्या पायऱ्यावर प्रति विधानसभा भरवून कामकाज करण्यास सुरुवात केली. मात्र या कृत्यावर विधानसभेत चर्चा होवून सदरप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले. सकाळी …

Read More »

विरोधकांच्या धमक्या आणि फोन टँपिंगची उच्चस्तरीय चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुडबुध्दीने कारवाई करण्याच्या उद्देशाने फोन टँपिंग करण्यात येत आहे. तसेच सभागृहात भाजपाचे आमदार उघडपणे धमक्या देत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नाना पटोले आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर या दोन्ही प्रश्नांची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही …

Read More »

अखेर राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती

हिंगोली: प्रतिनिधी राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ …

Read More »