Tag Archives: jayant patil

विरोधकांच्या धमक्या आणि फोन टँपिंगची उच्चस्तरीय चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुडबुध्दीने कारवाई करण्याच्या उद्देशाने फोन टँपिंग करण्यात येत आहे. तसेच सभागृहात भाजपाचे आमदार उघडपणे धमक्या देत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नाना पटोले आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर या दोन्ही प्रश्नांची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही …

Read More »

अखेर राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती

हिंगोली: प्रतिनिधी राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ …

Read More »

सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नांदेड: प्रतिनिधी सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो …

Read More »

जयंत पाटील म्हणाले भाजपा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी …

Read More »

जयंत पाटील ११ दिवसात फिरणार ८ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला आजपासून मराठवाड्यातून सुरुवात

उस्मानाबाद-तुळजापूर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या टप्प्यातील परिवार संवाद दौर्‍याला मराठवाड्यातून आजपासून सुरुवात झाली असून तुळजाभवानी आईचे दर्शन महाद्वारात उभे राहून घेत राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला. परिवार संवाद दौर्‍याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित …

Read More »

लस घेतली तरी विधिमंडळ अधिवेशनासाठी कोरोना चाचणी आवश्यकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, …

Read More »

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट अलमट्टी धरण पाण्याविषयी दोन्ही राज्यांचा योग्य समन्वयासाठी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य …

Read More »

काँग्रेस आऊट ?…जयंत पाटलांचे शिवसेनेबरोबरील युतीचे स्पष्ट संकेत ... तर महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »

पंतप्रधानांसोबत भेटीनंतरच्या त्या वावड्यांचा विचार करू नका राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी कुणी काही म्हणो सरकार बनवण्याच्या दिवसानंतर चर्चा आणि वर्तमान पत्रात व टेलिव्हिजनचं डिस्कशन… किती दिवस… किती आठवडे… किती महिने काढेल असं होतं. पण आता कोण चर्चा करत नाही. काल – परवा थोडीफार चर्चा झाली. परंतु मला त्या चर्चेची चिंता वाटत नाही. राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. त्याअगोदर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत …

Read More »

मंत्री वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयात केवळ वेळेचा अभाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनलॉक जाहिर करण्यावरून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली परस्पर वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही असे सांगतानाच वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती …

Read More »