Tag Archives: jayant patil

जयंत पाटील यांचा सवाल, ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? शेतकरी इतका हतबल कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे - जयंत पाटील

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते ब्राम्हण संघटनांचा विरोध आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरूनहूनही केली टीका

मागील काही दिवसांपासून या ना त्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. फुले चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावरून नाराजी …

Read More »

शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव आणि शिवसेनाओएफसी निलेश राणे यांच्यात चकमक लक्षवेधी सूचनांवरून उडाली चकमक

विधानसभेच्या  कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.  या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा  एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा  तालिका अध्यक्ष योगेश सागर …

Read More »

अजित पवार म्हणाले, जयंतराव ऊसाचं टनेज वाढलं की नाही… पण तुमचा… संबध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही मिश्कील संवाद

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या राज्यात सुरु आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला आज अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार हे सातत्याने जयंतराव पाटील यांना …

Read More »

आता हॅलो नाही तर जय शिवराय बोला, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला सल्ला

मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मुघल शासक यांच्या विषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यातच या मुद्यावरून सत्ताधारी भाजपाकडून वारंवार अशा चर्चांना पुरूस्कृतही केले जात आहे. यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. त्यामुळे या चर्चेत आणखीनच …

Read More »

त्या वक्तव्याने संशयाच्या भोवऱ्यातील जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, आता मला बाहेर… शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत

मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सततच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी रात्री उशीराने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटल्याचे वृत्त पुढे आली. तसेच त्यांच्या संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नव्या कॉलेजच्या उद्घाटनाला भाजपाचे नेते नितीन गडकरी हे …

Read More »

शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार

आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …

Read More »

अंबादास दानवे यांची ग्वाही, शक्तीपीठ महामार्ग ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला समोर बोलताना दिली ग्वाही

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुर येथील …

Read More »

जयंत पाटील यांची टोला, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर आणि पोकळ वासा महाराष्ट्र आता थांबणार.. एवढं बोलून चालणार नाही

राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर पोकळ वासा अशी खोचक टीका करत महाराष्ट्र आता थांबणार नाही एवढं बोलून चालणार नाही असा इशाराही यावेळी देत अजित पवार …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …

Read More »