२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” …
Read More »धमकीच्या मुद्यावर बोलू न देता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सगळे आमदार माजलेत असे… पडळकर-आव्हाड प्रकरणाच्या पडसादावरील चर्चेत बोलताना व्यक्त केली भूमिका
पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्या सोशल मिडीयावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात …
Read More »जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, पुढच्या आठवड्यात विचारेन आमचे चांगले संबध असले तरी मला विचारण्याचा अधिकार नाही
काल सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तावर उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक सुरक्षा विधेयकामुळे शहरी नक्षलवाद, लोकशाहीविरोधी संघटनांना आळा हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्या विरुद्ध
बहुचर्चित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. सभागृहात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे विधेयक डाव्या पक्षांच्या आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्याविरुद्ध आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही, …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी
नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …
Read More »गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल
पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …
Read More »विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …
Read More »
Marathi e-Batmya