मुंबई: प्रतिनिधी सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. मुंबईसह …
Read More »मुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग …
Read More »राज्यातील कोरोनाच्या बालरुग्णांची टक्केवारी आणि संख्या जाणून घ्या आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या …
Read More »केंद्रामुळे महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आतातरी केंद्राने एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केला. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करायचा कि कडक निर्बंध याप्रश्नी राज्यातील जनतेशी …
Read More »लस वाटपातही केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायच लस साठा कमी आल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न देण्याचे काही थांबत नसून लस वाटपातही केंद्र सरकारकडून अन्याय झाला आहे. राज्यातल्या फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सना द्यावयाच्या लसीच्या निम्मा वाटाच केंद्राने पाठविला आहे. त्यामुळे राज्यातल्या फक्त ५ लाख वॉरियर्सना लस देणे शक्य होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना …
Read More »रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …
Read More »ऐन दिवाळीत आनंदाची बातमी: राज्यातील आणखी एका पाणथळाची आंतरराष्ट्रीयस्तरावर निवड वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केल्याची माहिती, वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. मागील दहा वर्षापासून या संदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता आणि जुलै २०२० मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती. …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला मंदिरांचे आश्वासन तर विरोधकांना इशारा घट झालीतरी कोविड सेंटर सुरुच ठेवणार: पण विकासकामात खडा टाकू नका
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या कमी होत असली तरी ही संख्या कमी करण्यामागे तुम्ही सर्वजण आहात. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस आपल्या सर्वांच्या कसोटीचे असून युरोपातील परिस्थिती पाहता राज्यात त्याची पुन:रावृत्ती नको म्हणून आणखी सहा महिने कोविड सेंटर आपण असेच सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …
Read More »Missionbeginagain अंतर्गत १५ ऑक्टोंबरपासून या गोष्टी सुरु होणार राज्य सरकारकडून अद्यादेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात Missionbeginagain अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येण्यात येणार होती. तसेच १५ ऑक्टोंबरपासून मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या लोकल रेल्वे वगळता घाटकोपर ते अंधेरी-वर्सेाव्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने दिलासा …
Read More »
Marathi e-Batmya