Tag Archives: maharashtra

नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …

Read More »

बंद कारखान्याच्या जमिनीवर घरे बांधण्यास उद्योजकांना मोकळीक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी महानगरे, शहरांमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जमिनीवर आता घरे बांधून रग्गड नफा कमाविण्याचा मार्ग उद्योजकांना झाला असून अशा बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या जमिनीचा वापर निवासी घरे बांधण्याच्या निर्णयास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे मोठ मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या कारखान्याच्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात …

Read More »

घाण, कचरा टाकणार आणि थुंकणार असाल तर दंड भरण्याची तयारी ठेवा शहरांमध्ये १५० ते ५०० आणि तालुक्यात १०० ते ५०० रूपयांपर्यत भरावा लागणार

मुंबईः प्रतिनिधी रस्त्यांने चालताना कचरा टाकणार असाल किंवा थुंकणार असाल किंवा लघवी लागली असेल तर योग्य ठिकाणीच या सर्व गोष्टी करा. नाहीतर या गोष्टी करून बसाल आणि त्याची भरपाई तुम्हाला १०० ते ५०० रूपये भरून करावी लागेल. राज्यात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने रस्त्यांवर थुंकणे, कचरा आदी टाकूण घाण करणे, उघड्यावर लघवी, …

Read More »

दुसऱ्याच्या घरबांधणीसाठी राबणाऱ्यालाही मिळणार हक्काचे घर ५० हजार घरे बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांकडून दुसऱ्यांच्या घराच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असतात. त्या बदल्यात त्यांना वेतनही मिळते. मात्र ते अत्यंत तुटपुज्या स्वरूपात मिळत असल्याने आणि त्यांच्या कामाची कोणतीही शाश्वती नसल्याने अशा बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरांसाठी उन्हातान्हात काम करणाऱ्यांच्या …

Read More »

वर्ष अखेरीस राज्यात कर्ज काढून ३ लाख ४१ हजार कोटींची विकास कामे सर्वाधिक कामे मुंबई आणि ठाणे शहरात

मुंबई : गिरिराज सावंत राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांच्या घोषणेचा एकच धडका लावला. या घोषणेनुसार राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये ३ लाख ४१ हजार ४९०.५१ कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात आली …

Read More »

कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे केंद्राची आऊटलेट फार्मसी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये

Medical Expense

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत देशातील कॅन्सर व हृद्यरोग आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी स्थानिक पातळीवर आऊटलेट फार्मसी सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे या फार्मसी सुरु करण्यात येणार असून या फार्मसीमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधे मिळणार …

Read More »

खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरा पण तात्पुरत्या राज्य सरकारचे सर्व विभागांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, मागासवर्ग, इतर मागासवर्ग आदीं प्रवर्गाच्या पदोन्नतीतील जागा भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र या पदोन्नतीच्या जागांमधील खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या रिक्त जागा भरून घेण्याचे मात्र तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभांगाना नुकतेच दिले. राज्य सरकारच्या विविध विभागांमधील …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता हिवाळ्यात ? केंद्राच्या निर्णयानंतर लगेच राज्य सरकारही निर्णय घेणार

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणले जाते. या कालगणनेनुसारच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र या नेहमीच्या कालगणनेनुसार न जाता राज्याचा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर करण्याऐवजी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत सादर करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याची माहिती राज्याचे सांसदीय कार्यमंत्री …

Read More »

समृध्दी महामार्गासाठी आता अंतिम अर्थ पुरवठादाराच्या होकाराची प्रतिक्षा दक्षिण कोरिया कंपनीकडून शेवटची पाहणी पूर्ण

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या मागे असलेले वित्तीय शुल्क काष्ठ काही केल्या अद्यापही सुटायला तयार नाही. या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे आव्हान मोठ्या प्रमाणावर असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या प्रकल्पास वित्तीय सहाय करण्यास दोन्ही वेळेस नकार दिल्याने दक्षिण कोरियाच्या आर्थिक मदतीची शेवटची आशा राज्य …

Read More »

महात्मा फुले जीवनदायीतून कर्करोगावरील उपचारासाठी मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र राज्यात कर्करोगाचे वाढते रूग्ण लक्षात घेता महात्मा फुले जीवनदायी आरोग्यसेवेच्या माध्यमातून इतर मोठ्या आजारांबरोबरच कर्करोगाच्या रूग्णांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमीपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या शुभारंभ मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष  भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर …

Read More »