नागपूर : प्रतिनिधी राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढली असून या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा
नागपुर: प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये पट पडताळणी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्ट अधिकारी-शिक्षकांवर कारवाई केली की, मॅटमध्ये जातात. संस्थाचालक, शिक्षक आणि अधिकारी यांची एक टोळीच राज्यात कार्यरत असून त्यांची सर्वकष चौकशी करून त्याची पाळेमुळेच खोदून काढणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. विधान परिषदेत लक्षवेधी …
Read More »माहिती कायद्याच्या दुरूपयोगासंदर्भात कडक उपाययोजना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
नागपुर: प्रतिनिधी माहिती अधिकारात कोणती माहिती मागण्यात येते, कोणती माहिती देता येणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश माहिती अधिकार कायद्यात आहे. तरी देखील त्यात अखिक स्पष्टता यावी याकरीता आपण समिती नियुक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी मागितलेली माहिती व माहिती अधिकारातील तत्वं याची सांगड घालणारा शासन निर्णय लवकरच काढला जाणार असून या कायद्याचा …
Read More »मराठा आरक्षणातल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी सरकार पर्याय शोधणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केल्यानंतर नोकर भरती करण्यात आली. मात्र या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत मिळालेल्या युवकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून पर्याय शोधला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर …
Read More »ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा महिनाभरात निश्चित करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. …
Read More »कोणी कितीही सांगितले तरी माझ्या कामाचे श्रेय मलाच मिळते महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रतिनिधी राज्यात मंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. ही योजना देशातील इतर राज्यांनाही चांगलीच आवडली असून राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी त्याची अंमलबाजवणीही सुरु केली आहे. त्यामुळे जी योजना मी सुरु केलेली आहे. त्याचे श्रेय मलाच मिळणार असून ती …
Read More »ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल
नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार …
Read More »बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन
नागपुर : प्रतिनिधी नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत …
Read More »वांद्रे येथील शासकिय घरे मालकी हक्काने देण्याबाबत सरकारकडून चालढकल मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्याचे सा.बां.मंत्री पाटील यांचे उत्तर
नागपुर : प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील शासकिय वसाहतीतील घरे सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देण्याबाबत मी व्यक्तीश: सकारात्मक आहे. मात्र हा निर्णय मोठा असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतरच याविषयी अधिक बोलणे योग्य होणार असल्याचे गोलमाल उत्तर सार्वजनिक बांधकांम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोडकळीस …
Read More »राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर
नागपूर: प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात …
Read More »
Marathi e-Batmya