राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटला होता. कोरोनाचे दोन वर्षांचे भिषण संकट, भाजपाकडून केंद्रीय संस्था आणि राज्यपालांच्या माध्यमातून केली जाणारी षडयंत्रे यावर मात करत राज्यातील गुंतवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातंय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेवर टीकास्त्र
आम्हाला फक्त समाजातच नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जात आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे . भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत अशी टीका आंबेडकर यांनी आज ट्वीट करीत …
Read More »लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …
Read More »राजू शेट्टी यांची स्पष्टोक्ती, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय…. महाविकास आघाडीने एकदा विचारायला हवं होतं
इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. …
Read More »राज्य सरकार बदलताच सरकारच्या प्रशासनाची भावनाही बदलली का? मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्याखालील माहिती देण्यास टाळाटाळ
राज्यात तीन पक्षांचे असलेली महाविकास आघाडी सरकार जावून पुन्हा दुसऱ्या तीन पक्षांचे महाशक्तीच्या पाठिंब्याचे अर्थात महायुतीचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले. मात्र हे सरकार स्थानापन्न होऊन राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागात गेलास अनेक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असून माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊनही त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्यही त्या त्या …
Read More »उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उमेदवारांचा आग्रह धरू नका आपण… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले
राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली असून आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला लढायचे आहे. त्यामुळे उमेदवारांचा आग्रह धरू नका, पण त्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव …
Read More »मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड
राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी …
Read More »राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही
आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट इंडिया आघाडीची बैठक तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर केली सविस्तर चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया …
Read More »महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा घेतला आढावा ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन केली पाहणी
३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya