देशाचे पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाहिर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गाला आरक्षण देताना आणि आणि अनेक योजना जाहिर करताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ओबीसी मतदारांना जपण्याचे भूमिका स्विकारली. त्यातच महाराष्ट्रातही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. तर त्यांच्या भूमिकेला विरोध …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, महायुतीचे रिपोर्ट नाहीतर गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ आश्वासन
महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर …
Read More »नाना पटोले यांचा टोला, मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’ नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे भाजपा युती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल.
कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते ठरवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला हात लावाल तर करेक्ट कार्यक्रम… महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेतील रकमेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाढ करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसऱ्याबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत बहिणींना …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती ,राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीसाठी सज्ज विरोधकांना फक्त टीकाटीपण्णी करण्यात आनंद
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »गणेश हाके यांनीही जाहिर केली भूमिका, मनोज जरांगे ज्याला मदत करेल… आरक्षण टीकविण्यासाठी तो ज्याच्या विरोधात त्याला मदत करणार
विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहिर केल्यानंतर मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची आचारसंहिता जाहिर केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भूमिका जाहिर केली. त्यास काही अवधी लोटत नाही तोच ओबीसी नेते गणेश …
Read More »महायुतीच्या राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर निर्णय …
Read More »आचारसंहितेच्या भितीने राज्यपाल नियुक्त महायुतीच्या सात आमदारांचा उरकला शपथविधी १२ पैकी सात आमदारांचा उरकला शपथविधी
अपेक्षप्रमाणे दसरा सणानंतर विधानसभा निवडणूकीची आचार संहिता कधीही लागू होऊ शकते याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने आज सकाळी घाईघाईत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी ७ आमदारांची निवड करण्यात आली. तसेच या ७ आमदारांना विधानसभेत घाईघाईत शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?
मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …
Read More »
Marathi e-Batmya