Tag Archives: mumbai

मिरारोड दंगल प्रकरण: उच्च न्यायालयाकडून १४ जणांना जामीन सर्व आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही

अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथे उसळलेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या १४ तरुणांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. सर्व कथित आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, अटकेत असलेल्या सर्व अर्जदारांचा अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा …

Read More »

कुर्ला बेस्ट बस दुर्घटना प्रकरणीः चालक संजय मोरेला कोठडी चालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४८ …

Read More »

डॉ रेखा चौधरी यांची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तो नियम लागू करा मंत्रालयात वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा यशस्वी उत्सव

मंत्रालय येथे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे (WDDD) मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. डिजिटल आरोग्य आणि समतोल जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या या उपक्रमाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विचारपूर्वक आखलेले नियोजन आणि उत्साही सहभागामुळे या उपक्रमाने डिजिटल डिटॉक्स आणि सर्वांगीण कल्याणासाठी लोकांमध्ये वचनबद्धता निर्माण केली. यावेळी वर्ल्ड डिटॉकसच्या डेच्या संस्थापिका डॉ …

Read More »

कनिष्ठ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द २७ वर्षांपूर्वीच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

जवळपास २७ वर्षांपूर्वी घडलेल्या, पुण्यातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार जणांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासारखे हे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी भागवत बाजीराव काळे हे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्या. भारती …

Read More »

उच्च न्यायालयाचे निरिक्षण, केवळ छळाचा आरोप ही क्रूरता नव्हे राज्य सरकारने केलेले अपील फेटाळून लावले

सासरच्यांविरोधात निव्वळ छळा किंवा पैशांची मागणी केल्याचा आरोप ही क्रूरता ठरत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणादरम्यान नोंदवले. याचिकाकर्ता महिलेने सासरच्या मंडळींनी क्रूरतेची वागणूक दिल्याचा आरोपाचे उत्तर अनुत्तरीत आहे. सासरच्या मंडळींविरोधात निव्वळ छळवणुकीचा किंवा पैशांच्या मागणी केल्याचा आरोप करणे ही क्रूरता मानता येणार नाही. किंबहुना, भादंवि कलम ४९८(अ) मधील …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका

विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …

Read More »

१७३ आमदारांनी घेतली ५ भाषांमध्ये घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ ७ जणांनी घेतली संस्कृतमध्ये, दोघांनी हिंदीत घेतली शपथ

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात पहिले दोन दिवस निवडूण आलेल्या सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी भाजपा आणि महायुतीतील असे मिळून १७३ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठीत शपथ घेतली. तर काही जणांनी संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेत …

Read More »

मुंबईतल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रश्नी आता उच्च न्यायालयाचा पुढाकार उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

मुंबईकरांना आणि मुंबईवर परिणाम करणाऱ्या मुख्य आणि ज्वलंत समस्यांवर प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक असून या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्र ओळखून घोषित करताना यातील गुंतागुंतीसह झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या (झोपु) अंमलबजावणीवर परिणाम करणाऱ्या १०० हून अधिक समस्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल गुरुवारी उच्च न्यायालयात …

Read More »

मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल, नौदल अधिकारी सहआरोपी का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळासाठी निविदा कोणी काढल्या?, तो पुतळा कसा उभारावा हे कोणी ठरवले? जर नौदलाने या पुतळ्यासाठी निविदा काढल्या तर जयदीप आपटे यांना कोट्यवधी रुपये देण्यापूर्वी पुतळ्याचे बांधकाम योग्य आहे की नाही याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्याने केली?, ही पाहणी केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामाचे पैसे दिले गेले का?, अशी प्रश्नांची …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश विक्रीकर अधिकाऱ्याची अटक बेकायदा सुनावणीवेळी दिले उच्च न्यायालयाने आदेश

ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १६ अपात्र कंपन्यांना एकूण १७५ कोटी रुपयांचा फसवा कर परतावा दिल्याबद्दल अटक केलेल्या विक्रीकर अधिकारी अमित लालगे यांची अटक बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. कोणत्याही व्यक्तीला का अटक करण्यात आली आहे त्याची …

Read More »