Tag Archives: nawab malik

स्वत:वरील गुन्हे लपविल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दयावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …

Read More »

आधी बनवा आणि मग नावाची भांडणे करा समृध्दी महामार्गाला नाव देण्याच्या मागणीवरून नवाब मलिक यांचा सेना-भाजपला टोला

मुंबई : प्रतिनिधी समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृध्दी महामार्ग बनवा नंतर नावाची भांडणे करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची …

Read More »

ही कसली प्रगती ? ही तर अधोगती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सेना-भाजप युतीला ३१ ऑक्टोंबरला चारवर्षे पूर्ण होत असून या चार वर्षात सरकारने काय केले असा सवाल करीत ही कसली प्रगती ही तर अधोगती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्य असुरक्षित अर्थशुन्य, अशांत, असहाय्य असल्याचे सांगत राज्य सरकारने काय केले असा सवाल त्यांनी विचारला. …

Read More »

छत्रपतींच्या स्मारकाला तांत्रिक परवानगी नाही सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा नवाब मलिक यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. …

Read More »

धन्यवाद सनातन संस्था, आता मी कोर्टातच सिध्द करेन नवाब मलिक यांनी स्विकारले सनातनचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी धन्यवाद सनातन संस्था…मला कोर्टात सिध्द करण्याची संधी दिली आणि मी ते कोर्टातच सिध्द करेन… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सनातन संस्थेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे. सनातन संस्थेने आज नवाब मलिक यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसीमध्ये सनातन संस्थेने संस्थेची बदनामी केल्याचे …

Read More »

संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली. ही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या …

Read More »

राज्यात दोन्ही काँग्रेस आणि समविचारी पक्षांना घेवून निवडणूका लढणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली. या सभेला …

Read More »

काँग्रेसला अखेर तीन जागा दिल्यानंतरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी विधान परिषदेसाठी आघाडी झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने देत लातूर आणि परभणीच्या एका जागेची अदलाबदल करत नाशिक, सिंधुदुर्ग आणि वर्धा, अमरावती जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेसाठी आघाडी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. बँलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

अखेर खा.सुप्रिया सुळेंच्या इच्छेने प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील अजित पवारांचे महत्व घटले

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य निवडीवरून पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादांवर अखेर खा. सुप्रिया सुळे यांच्या अंतिम इच्छेनुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड करत पडदा पडला. त्यामुळे संघटनांत्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीला …

Read More »