Tag Archives: ncp

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, आज वाद नाहीतर कोथळा…. स्व. मृणालताई गोरे यांच्या जागविल्या आठवणी

मुंबई: प्रतिनिधी केशवराव गोरे स्मारक सभागृहात यापूर्वी अनेक वाद व्हायचे पण ते वाद राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असायचा पण आज तो सुसंवाद पाह्यला मिळत नाही. आता कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरली जात असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. गोरेगांव येथील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्यावतीने मृणालताई …

Read More »

औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत झालेल्या भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे वक्तव्य भाजपाच्या दोन मंत्र्यांकडे बघत केले आणि भाजपात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच …

Read More »

मलिक यांचा केंद्रावर आरोप म्हणाले, वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून…. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा – वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप करत  हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन …

Read More »

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री तर मला नेहमी…. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

पुणे : प्रतिनिधी औरंगाबादेतील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल अशी उत्सुकता लागू राहीली होती. त्यानुसार अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. प्रत्येकाला काय …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “भावी सहकारी” आणि “डाव्हर्जन” वर मुख्यमंत्र्यांसह कोण काय म्हणाले ? भाजपा मंत्र्याकडे पाहून मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. …

Read More »

…आणि औरंगाबादचे आता “संभाजीनगर” शासकिय नामांतर झाले ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला

औरंगाबाद : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा मुद्दा उपस्थित होत भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राजकिय कुरघोड्यांना ऊत येत भाजपानेही संभाजीनगर नामांतर कधी करणार असा सवाल करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबादाचा उल्लेख संभाजीनगर करत अनौपचारीक नामांतर …

Read More »

सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशामुळे अजित पवारांची अडचण होणार ? पेट्रोल-डिझेलचा जीएसटी करात समाविष्ट करण्याचे या आधीच राज्य सरकारचे पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशातील नागरीकांना स्वत: दरात पेट्रोल-डिझेल देण्यासाठी या दोन्ही वस्तुंचा समावेश जीएसटीत करण्याचे संकेत केंद्राने दिल्यानंतर यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला राज्याच्या कर लागू करण्याच्या अधिकार गदा आणू नका असा इशारा दिला. त्यास काही तासांचाच अवधी लोटला नाही तोच भाजपा नेते तथा माजी अर्थमंत्री …

Read More »

लोककलावंत सुरेखा पुणेकर यांच्यासह यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाला कार्यक्रम

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोककलावंत सुरेखाताई पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश …

Read More »

शहरी भागातील नव्या रेशनिंग दुकानासाठीची बंदी उठविली नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार- मंत्री छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आणि कोरोनामुळे गरजूंना अन्न धान्यांचे वाटप लगेच व्हावे या उद्देशाने शहरी भागात असलेली नव्या रेशनिंग दुकानावरील अर्थात रास्त भाव दुकाने सुरु करण्याबाबत असलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागात आता नव्याने रेशनिंग दुकान सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती अन्न …

Read More »

वडेट्टीवार मोठे विधान,….प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा द्यायला तयार ओबीसी आरक्षणावरून वातावरण पुन्हा तापणार

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि रिक्त झालेल्या पंचायत समित्यांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला. तरीही राज्यातील राजकारण ओबीसी आरक्षणावरून पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत असून माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य राज्याचे …

Read More »