मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात आज घेण्यात आला. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन गरमच राहण्याची शक्यता आहे. नागपूर करारानुसार वर्षभरातील एक अधिवेशन नागपूरात घ्यावे असे बंधनकारक आहे. याकालावधीत संपूर्ण राज्याची प्रशासकिय आणि सरकार नागपूरात स्थलांतरीत होते. मात्र …
Read More »शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …
Read More »नावात “जय” आणि “नाथ” असलेल्यांची भाजपाला अॅलर्जी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत लगावला टोला
परभणी : प्रतिनिधी ज्यांच्या नावात जय, नाथ आहेत अशी माणसे आजकाल भाजपाला चालत नाहीत. त्यामुळे धनंजय, जयसिंग सारखी माणसे तसेच गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत असा टोला भाजपाला लगावत त्यामुळेच आता त्यांना प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी …
Read More »भाजपाच्या विरोधाची वर्षपूर्ती महाराष्ट्र विरोधी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी होतेय ?
देशात आणि राज्यात वारंवार काँग्रेसची सत्ता येत असताना काँग्रेसेतर पक्षांना मिळणारी मते आणि त्यांना मिळणाऱ्या निवडणूकीतील जागांमुळे असं म्हटलं जायचं कि, लोकशाहीत जर सर्व काँग्रेस विरोधी पक्ष आले तर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही आणि विरोधकच वर्षानुवर्षे सत्तेत राहीतील. या म्हणण्यातील सत्यता महाराष्ट्रात उतरली. परंतु ती काँग्रेसबाबतीत नाही तर काँग्रेसचा …
Read More »दिवाळीनिमित्त शरद पवारांचे आईला खुले पत्र, वाचा त्यांच्याच शब्दात भावनिक नात्यांबरोबर जून्या आठवणींना उजाळा
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे कर्त्येधर्त्ये तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्वर्गीय आईला खुले पत्र लिहित आपल्या गतकालीन आठवणींना उजाळा देत आईबरोबरील भावनिक नात्यांबद्दलचे मनोगत पत्राद्वारे व्यक्त केले. त्यांच्या राजकिय जीवनात एकएक पदे वर जाताना आईच्या शिकवणूकीची आठवण आणि त्यांची सतत होणारी उणीव याबदलच्या भावनांना पहिल्यांदाच पवारांनी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांना दिली उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड …
Read More »राज्यपालांनी अर्णवपेक्षा न्यायासाठी भटकणाऱ्या नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी एका गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या …
Read More »भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लागले म्हाडाचे वेध, जोडीला राष्ट्रवादीची शिफारस झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्तीसाठी लॉबींग
मुंबई : विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आणि सहकार विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना आयएएस पदावर प्रमोशन मिळवून देण्याप्रकरणी मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अधिकाऱ्याला म्हाडात येण्याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे त्या पदावर सदर अधिकाऱ्याला नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिफारस पत्र …
Read More »या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक …
Read More »राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हे आव्हान निवडणूकीतील डिपॉझिट जप्त करण्याची ताकद
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला …
Read More »
Marathi e-Batmya