या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बचावासाठी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या बाजुने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील तर या देशाने मान्य करायचे का भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत असे ट्वीट करुन नवाब मलिक यांनी भाजपाला चांगलेच पेचात पकडले आहे.

About Editor

Check Also

डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचे संस्थापक माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे निधन वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव अर्थात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *