Tag Archives: ncp

भाजपाने २०१९ च्या संकल्प पत्र जाहीर करताना २०१४ चा जाहीरनामा वाचायला हवा होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात इथे निवडणूक नाही..मग पंतप्रधान-गृहमंत्री कशाला येतायत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल

अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा …

Read More »

पंतप्रधान पदावरच्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकावीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खोचक सल्ला

औरंगाबाद – कन्नडः प्रतिनिधी पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत …

Read More »

धारावीचा पुनर्विकास १० वर्षासाठी रखडला निविदा प्रक्रियाच पुन्हा नव्याने होणार

मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …

Read More »

भाजपाची परिस्थिती म्हणजे, करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत पवारांनी साधला मोदींवर निशाणा

मुंबईः प्रतिनिधी पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला. मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी …

Read More »

जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

राज्यावर ४ लाख कोटींच कर्ज केलं पण विकास किती झाला ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल

वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …

Read More »

इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका

अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …

Read More »