मुंबई: प्रतिनिधी परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. अहमदनगरच्या शेतकर्याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे …
Read More »शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …
Read More »जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल
नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …
Read More »विजय सिंगच्या मृत्यूची मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करा आयोगात राष्ट्रवादी खटला लढविणार असल्याची प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस …
Read More »आणि तेल लावलेल्या पैलवानाने अब की बार २२० पारचा वारू अडविला शरद पवारांच्या झंझावातामुळे मरगळलेल्या काँग्रेसला ४३ हून अधिक जागा तर राष्ट्रवादीला ५० हून अधिक
मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कशातच सापडत नसल्याचे प्रशस्तीपत्रक शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. तर त्याच अनुषंगाने विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी समोर विरोधक रूपी पैलवान दिसल्याचे वक्तव्य करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे दाखवून दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ …
Read More »मतमोजणीच्या कामासाठी पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या २४ रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व …
Read More »बंडखोरीमुळे भाजपा-शिवसेनेच्या २८ हून अधिक जागांमध्ये घट होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल काही तासानंतर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेने परस्पराविरोधात बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची हमी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वांद्रे पश्चिम, माण, मीरा-भाईंदर, …
Read More »मंत्री रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर …
Read More »
Marathi e-Batmya