Tag Archives: ncp

इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका

अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …

Read More »

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …

Read More »

भाजपा उमेदवाराचे नाव काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत आघाडीच्या शपथनाम्यात गोंदीयाच्या उमेदवाराचे नाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक लहान-मोठ्या पक्षांना घेवून आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जाहिरनामा समितीत भाजपाचे गोंदीयातील उमेदवार गोपालदास अगरवाल यांचे नाव असल्याने आघाडीच्या जाहीरनाम्याच्या शपथनामाबाबत संशय निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीमध्ये भारतीय कम्युनिस्ट …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …

Read More »

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस राड्याचा बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपात तर घाटकोपर आणि बोरीवलीत भाजपा नेत्यांच्या समर्थकात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विद्यमान आमदार-मंत्री यांना तिकिट नाकारल्याने बोरीवली आणि घाटकोपरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राडा केला. तर बारामतीत भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या रँलीवरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. बोरीवलीचे विद्यमान आमदार विनोद तावडे …

Read More »

मुंबई मनपा आर्थिक संकटात ;महापालिका आयुक्तांचे अतितात्काळ परिपत्रक मुंबई महानगरपालिकेचे खाजगीकरण करण्याचा भाजप- सेनेचा डाव असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकाचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते असा सवाल करतानाच भाजप – सेना मनपाचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान नवाब मलिक यांनी महापालिका आयुक्तांनी काढलेल्या …

Read More »

पवार म्हणतात संपर्कात खडसे- पवारांच्या संपर्कात नाही अखेर खडसेंना तिकिट नाहीच

ठाणे-जळगांवः प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जन्म बारामतीचा असून मागील तीन महिन्यापासून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील सभेत केला. त्यामुळे नाराज खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याच …

Read More »

चंद्रकांत दादा, शिवस्मारकावर एकदा होवूनच जाऊ द्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »