मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …
Read More »भाजपाची परिस्थिती म्हणजे, करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत पवारांनी साधला मोदींवर निशाणा
मुंबईः प्रतिनिधी पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला. मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी …
Read More »जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …
Read More »राज्यावर ४ लाख कोटींच कर्ज केलं पण विकास किती झाला ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल
वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …
Read More »इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका
अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »जयंतरावांचे क(र)मळा आता संजयमामाच्या मनगटावर करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
सोलापूरः प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात जगताप विरूध्द मोहिते-पाटील असा असलेला सामना आता जवळपास आता निकाली निघालेला आहे. त्यातच माजी आमदार जयंतराव जगताप हे न्यायालयीन लढाईत गुंतलेले असल्याने करमाळ्यातून अपक्ष म्हणून उभे राहीलेल्या संजयमामा शिंदे यांच्या उमेदवारीला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने जयंतरावांचा करमाळा आता संजयमामांच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …
Read More »राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …
Read More »मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …
Read More »भाजपा उमेदवाराचे नाव काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत आघाडीच्या शपथनाम्यात गोंदीयाच्या उमेदवाराचे नाव
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक लहान-मोठ्या पक्षांना घेवून आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जाहिरनामा समितीत भाजपाचे गोंदीयातील उमेदवार गोपालदास अगरवाल यांचे नाव असल्याने आघाडीच्या जाहीरनाम्याच्या शपथनामाबाबत संशय निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीमध्ये भारतीय कम्युनिस्ट …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya