Tag Archives: ncp

राज्य सहकारी बँकेसंदर्भातील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित हिम्मत असेल तर युती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करुन दाखविण्याचे काँग्रेसचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी सरकारच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजप सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून हिम्मत असेल तर युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करून दाखवावी असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी वारंवार …

Read More »

न बोलवताच २७ सप्टेंबरला स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नसल्याची शरद पवारांची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक संचनालयाने अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्या विषयीची माहिती कळाल्याने ईडीला तपासात सहकार्य करण्यासाठी स्वतः २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जावून ते जे देतील तो पाहुणचार स्विकारणार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद …

Read More »

शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, …

Read More »

भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजपा शिवसेना सरकारचा शिवस्मारकातही भ्रष्टाचार! न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त मागणी

मुंबईः प्रतिनिधी शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीट चे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजप सरकारने शिवस्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे पाप केल्याचा …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद

मुंबईः प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »

यांचे निर्णय… यांची धोरणं चुकल्याने राज्य संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सरकारवर टीका

जालना: प्रतिनिधी आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणं चुकली आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसत आहे. राज्य मोठ्या संकटात आहे असं असताना यांना झोप तरी कशी लागते असा सवाल करतानाच यांना खरा आदेश देवून टाका असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना …

Read More »

इतका खोटारडा पंतप्रधान देशातील जनतेने पाहिला नाही नवाब मलिक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान

मुंबई: प्रतिनिधी पवारसाहेब काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार …

Read More »

पंतप्रधान मोदीमध्ये मंदीची आकडेवारी जाहीर करण्याची ताकद नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नांदेडः प्रतिनिधी देशात मोठी मंदी आल्याचे सांगितलं जातंय. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. इतके कारखाने आलेत पण किती आले ते सोडून किती कारखाने बंद झाले याचे आकडे मोदीनी द्यावे. पण हे आकडे द्यायची त्यांची ताकद नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान …

Read More »