Tag Archives: ncp

त्या घोटाळ्याशी माझा संबध नाही निवडणूका आल्याने आदेश आणि नोटीसा आल्याचा अजित पवारांचा दावा

परभणी- पाथरीः प्रतिनिधी पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा यत्किंचितही संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस… असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा. परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे …

Read More »

शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त, तर गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

वाशिम – कारंजा: प्रतिनिधी रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या, त्यांचे संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत असून कर्नाटकच्या …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर काँग्रेसला १४४ जागा देण्याची अँड. प्रकाश आंबेडकरांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चार बड्या पक्षांकडून आघाडी-युतीची आणि जागा वाटपाची अद्याप चर्चाच सुरु आहे. मात्र तत्पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचा राजीनामा जाहीर करत पोलिसांची आठ तासाची ड्युटी करणार तर होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे आश्वासन अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले. बँलार्ड …

Read More »

सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे …

Read More »

सरकारला कशाची मस्ती आलीय… कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

औरंगाबाद – बालानगरः प्रतिनिधी या सरकारला कशाची मस्ती आलीय, शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला. पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणाऱ्या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्‍या …

Read More »

आयोजकांनो दहीहंडीच्या खर्चापेक्षा पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवाला येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना …

Read More »

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांसाठी ५० लाखाची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश आणि मागण्यांचे निवेदन सुपुर्द

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे ५० लाखाचा धनादेश देण्यात आला शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या २५ विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार …

Read More »

कोल्हापूर, सांगली, कराडमधील १ लाख हेक्टर जमिनीच्या नुकसानीचा अंदाज अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची मुख्य सचिवांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या पुरामुळे १ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. …

Read More »

भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते सैरसफाटा मारायला आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. हे भाजप सरकार असंवेदनशील …

Read More »

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा… राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचा पगार देणार मुंबई अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यात कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्याप्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्हयात पूरग्रस्त परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर करत पूरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तासाठी देणार …

Read More »