Tag Archives: ncp

आर्थिक मंदी नाही तर भाजप नेत्याने स्वतः च्या कंपनीतील ४०० जणांना का काढले? राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यात सापडली आहे. तरीही केंद्र सरकार आणि भाजपाकडून देशात मंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग देशात मंदी नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना का काढले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी …

Read More »

मोठा भायने बोलू चे, युती ना करवा छे शिवसेनेने सोबत युती न करण्याचे भाजपा नेत्यांचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबर झटपट युती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच युतीची काळजी विरोधकांनी अथवा प्रसारमाध्यमांनी करू नये असे आवाहनही केले. मात्र निवडणूकीत प्रत्यक्ष शिवसेनेबरोबर कोणत्याही स्वरूपात युती करायची नाही असे स्पष्ट आदेश दिल्लीतील भाजपाच्या मोठा भायने राज्यातील नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सुत्रांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, निवडणूकीत लढाई फक्त वंचित सोबतच नांदेड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्य़ाचे वक्तव्य

नांदेड-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या विरोधकांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्याचे काही तासांपुर्वींच जाहीर करून काही तासांचा अवधी उलटत नाही तोच विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला रामराम ठोकत …

Read More »

बलात्कारी लोकांना पाठीशी घालणारे फडणवीस सरकार हाय हाय घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खा. सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे. विद्यमान …

Read More »

सोपल साहेब उभी हयात एका बाजूला आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेषाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

सोलापूर – माळशिरसः प्रतिनिधी सोपल साहेब उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात… वाह रे विश्वासू सहकारी… लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा समाचार माळशिरस येथील जाहीर सभेत घेतला. विधानसभेमध्ये …

Read More »

काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्तेतील मुजोरी लोक विसरले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

अ.नगर-पाथर्डीः प्रतिनिधी भाजपाच्या महाजनादेश यात्रेसोबत राज्यात अनेक यात्रा निघाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन यात्रा आहेत तर काँग्रेसची एक यात्रा सुरू होत आहे. त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्यांच्या यात्रांना जनता प्रतिसाद देत नाही. कारण पंधरा वर्षे सत्तेत असताना त्यांनी केलेली मुजोरी लोक विसरलेले नाहीत. तुम्ही पंधरा वर्षे त्रास दिलात म्हणून मतदारांनी …

Read More »

सोलापूरातील राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेना-भाजपात माढ्यात कमळ तर बार्शीत धनुष्यबाण

सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना गळाला लावण्याचे काम केले. आता आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपा-शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना पक्षात ओढण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे लवकरच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अंत्यत जवळचे माढ्याचे …

Read More »

आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद – वाशीः प्रतिनिधी ‘अ’ गेला तर ‘ब’ आहे आणि ‘ब’ गेला तर ‘क’ आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जाणारे खुशाल जावू देत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत मांडली. येत्या निवडणुकीत कुणी …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी विरोधकांवर टीकास्त्र

जळगांवः प्रतिनिधी निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो म्हणणाऱ्या बुद्धू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी ते सभेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव …

Read More »