महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्रासाठी मंगल कलश आणला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांना संघर्ष करावा लागला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करणे आणि …
Read More »जयंत पाटील म्हणाले, समित्यांचा निकाल म्हणजे राज्यात त्यांचे सरकार… याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने
महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजपा आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे …
Read More »बावनकुळेंच्या टीकेवर अजित पवार यांचा खोचक टोला, मी नागपूरला जाऊन टिप्स घेणार… त्यांच्याकडून माहिती घेऊन तसे काम करेन
राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण देत लोकसंख्येबाबत लोकांच्या वर्तनावर एक खंतही व्यक्त केली. त्याचबरोबर पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर …
Read More »अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनंतर जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य, पुढचा मुख्यमंत्री ठरला… आमचा पक्ष महाविकास आघाडीत मोठा
काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची आणि राज्याच्या नेतृत्वबदलाची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली. त्यातच एका जाहिर कार्यक्रमात अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसायला आवडेल का असा प्रश्न …
Read More »तुरूंगातून बाहेर पडताच सत्यजीत चव्हाण यशवंतराव प्रतिष्ठानवर, शरद पवार म्हणाले…. माती परिक्षण थांबविल्याशिवाय आणि फौजफाटा हटविल्याशिवाय बारसूप्रकरणी चर्चा नाही
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी (३० एप्रिल) ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते. शरद पवार …
Read More »जयंत पाटील म्हणाले, मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा दाखवून देणारा ७५ बाजार समित्या मविआच्या ताब्यात
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी जयंत पाटील म्हणाले, गेल्या …
Read More »उदय सामंत यांची बैठकीनंतर माहिती, बारसू प्रकरणी उध्दव ठाकरे यांना ब्रिफींग हवे असेल तर…. उद्योग मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले. मात्र, हे माती परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पांगविण्यासाठी महिला, मुलांसह सर्वांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थतीत तणाव निर्माण झाला. परंतु …
Read More »अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...
महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …
Read More »सुप्रिया सुळे यांनी तो व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या, महाराष्ट्र बंद नव्हे तर उघड्या डोळ्यांनी बघतोय…. नशिब आंदोलनकांवर अद्याप अर्बन नक्षलवादाचा ठपका....
बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा विरोध वाढत जात आहे. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेथील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, कोकणातील …
Read More »अजित पवार म्हणाले, चार-पाच लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे बाजूने तर…. वेळ पडल्यास मीही आंदोलकांच्या भेटीला जाईन
बारसू येथील रिफायनरीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी गरज पडल्यास जाईन असे सांगत आपली भूमिका …
Read More »
Marathi e-Batmya