Tag Archives: pratap sarnaik

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू

मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी …

Read More »

मंत्रिमंडळातील समावेशावरून प्रताप सरनाईक यानी व्यक्त केली तीव्र नाराजी प्रताप सरनाईक अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मतभेदाच्या चर्चेला उधाण

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन अडीच तीन महिने उलटत नाही तोच या सरकारमध्येही सगळे काही ठाकठिक सर्वकाही अलबेल आहे असे म्हणता येणार नाही. कोणी मंत्री पदावरून नाराज तर कोणी पालकमंत्री निवडीवरुन नाराज, कोणी चांगलं खातं मिळालं नाही म्हणून मंत्री पदावरून नाराज. एकूण सर्वत्र नाराजी दिसून येते. काही आमदार म्हणतात …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सरनाईकांच्याबाबत हे सांगितले चांगल्या कामासाठी निधी मिळाला आहे येथून पुढेही मिळेल

मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला आर्शिवाद द्या, आर्शिवाद द्या म्हणून कोणी देत नसते…. आंदोलन करायचे असेल तर सरकार विरोधात नव्हेतर कोरोना विरोधात करा-ऑक्सीजन प्लांटचा लोकार्पण सोहळा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असा टोला भाजपाला लगावत हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. …

Read More »

कोरोनामुळे अखेर उत्सवात दहीहंडी न फोडताच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …

Read More »

फडणवीस, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ फोन टॅपींगप्रकरणी चौकशी समितीची राज्य सरकारकडून स्थापना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात राजकिय नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शिवसेनेच्या आमदाराने पावसाळी अधिवेशनात केल्यानंतर यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. त्यानुसार राज्याचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षखाली एका समितीची स्थापना आज करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री …

Read More »

पाकिस्तानी म्हणणे, ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण; हे चालू देणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विरोधकांना धोबी पछाड

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी माओवादी म्हणणं, आणि केवळ हक्कभंग आणला म्हणून ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण असून अशा पध्दतीचे राजकारण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत तसेच कोणीही उठावं आम्हाला टपली मारून जावे या गोष्टीही …

Read More »

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण …

Read More »

संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच

मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला. ते …

Read More »

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मात्र विरोधकांना धमकाविण्यासाठी ईडीचा वापर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी …

Read More »