वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाचा नेतृत्वाचा वैचारिकदृष्ट्या गोंधळ उडाला असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत …
Read More »संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज
वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार
मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार …
Read More »राज ठाकरे यांची स्षष्टोक्ती, चित्रपटाने जागा होणारा हिंदू काही कामाचा नाही मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठीच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा
तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजं दैदिप्यमान कामगिरी समजली होय. त्याआधी तुम्हाला ती माहित नव्हती का? चित्रपटात विकी कौशल मेल्यानंतर तुम्हाला कसे हाल हाल करून मारले हे कळले. तर अक्षय खन्ना तुमच्यासमोर औरंगजेब बनून आला त्यावेळी तुम्हाला कळले का, तो काय माणू होता म्हणून. पण इतिहासाच्या पानावर काही …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, सरकार अदानीचे कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्यांचे नाही निवडणूकीतील आश्वासन पूर्ण करू शकत नाही
पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. बारामतीतील एका कार्यक्रमात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर यांनी …
Read More »दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधानसभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांचा सवाल आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? एसआयटी पथकाकडून अद्यापही चौकशी सुरु- राम कदम
मागील अनेक वर्षापासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सातत्याने शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर हाच मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. तसेच दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या …
Read More »त्या गाण्यावरून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कामराने अयोग्य केलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान चालतो अन् गद्दारांचा अपमान चालत नाही
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या …
Read More »नारायण राणे यांचा दावा, आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची दोनदा विनंती दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी शनिवारी केला. नारायण …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी लवकरच व्हाट्सअप क्रमांक नियमबाह्य भाडे आकारणी प्रश्नी वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक
प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा – टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील …
Read More »
Marathi e-Batmya