राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील.

मुख्य सचिव अजोय मेहता हे १९८४ च्या बँचचे आएएएस अधिकारी असून ३१ मार्च २०२०  रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र या आपातकालीन परिस्थितीत त्यांच्या जागी नव्या सचिवांची नियुक्ती करणे अशक्य असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवत त्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने या प्रस्तावास मान्यता दिली.

 

About Editor

Check Also

कल्याण जवळ झालेल्या अपघाताबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांचे संवेदनशील निवेदन कमी क्षमतेच्या वाहनात जास्तीचे प्रवाशी, ११ प्रवाशांचा मृत्यू

आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *