नवी दिल्ली येथे आज झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या अर्थात इंडिया आघाडीच्या घटक पक्ष असतानाही या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एकमेव विरोधी नेत्या. मात्र निती आयोगाच्या बैठकीतून त्या मध्येच बाहेर पडल्या. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बोलण्याची परवानगी नसल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर आरोप करत बैठकीतून बाहेर पडल्याचे सांगितले.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख विरोधी पक्षशासित राज्यांतील एकमेव मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेही आले नाहीत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर आले आहे. [आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री] चंद्राबाबू नायडू यांना बोलण्यासाठी २० मिनिटे देण्यात आली. आसाम, गोवा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी १०-१२ मिनिटे बोलले. अवघ्या पाच मिनिटांनी मला बोलण्यापासून थांबवण्यात आलं. हे अन्यायकारक आहे. विरोधी पक्षाकडून इथे मी एकटाच होते. मी बैठकीला उपस्थित राहिले कारण सहकारी संघराज्य बळकट केले पाहिजे, या भूमिकेतून उपस्थित राहिल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, २३ जुलै रोजी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प “पक्षपाती” असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की निती NITI आयोगाला कोणतेही आर्थिक अधिकार नसल्यामुळे ते काम करू शकत नाही आणि नियोजन आयोग पुन्हा आणायला पाहिजे अशी भूमिकाही यावेळी मांडली.
ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाले की, “अगदी बजेट…. हा राजकीय, पक्षपाती अर्थसंकल्प आहे. मी म्हणाले, तुम्ही इतर राज्यांशी भेदभाव का करताय? नीती आयोगाकडे आर्थिक अधिकार नाहीत, ते कसे चालेल? याला आर्थिक अधिकार द्या किंवा नियोजन आयोगाला परत आणा, अशी मागणी केल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी बंगालचे सर्व कल्याणकारी प्रकल्प थांबवले आहेत आणि राज्याला हक्काच्या आवास योजना आणि ग्रामीण रस्ते योजनेपासून वंचित ठेवले आहे. त्यांनी धान्य अनुदानही बंद केले आहे. आम्ही १.७१ लाख कोटी रुपयांच्या निधीपासून वंचित आहोत. या बजेटमध्ये शून्याशिवाय काहीही नाही. मी हे सांगितल्यानंतर लगेचच माईक बंद करण्यात आल्याचा आरोपही यावेळी केला.
“घड्याळाने फक्त तिची बोलण्याची वेळ संपल्याचे दाखवले. हे चिन्हांकित करण्यासाठी घंटा देखील वाजवली गेली नाही,” असे त्यात म्हटले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या बैठकीला विरोधी पक्षनेत्या म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल सरकारला आनंद झाला पाहिजे, परंतु त्यांनी त्यांच्या नेत्यांना जास्त वेळ दिला. “हे अपमानास्पद आहे आणि मी यापुढे कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही”.
केंद्रातील सरकार राजकीय पक्षपाती आहे. ते वेगवेगळ्या राज्यांकडे योग्य लक्ष देत नाहीत. त्यांनी काही राज्यांकडे विशेष लक्ष दिल्याने मला काही अडचण नाही. मी विचारले की ते इतर राज्यांशी भेदभाव का करत आहेत. याचा आढावा घेतला पाहिजे. मी सर्व राज्यांसाठी बोलत आहे. मी म्हणाले की आपणच काम करतो आणि ते फक्त दिशा देतात अशी टीकाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली.