प्रफुल पटेलांची घोषणा, बारामतीतून “अजित पवार” कार्यकर्त्यांचा घेराव महायुतीमध्ये विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर एकमत

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्याकडून त्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. मात्र आता जसजसे विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्याचा कालावधी जवळजवळ येत आहे. तसे महाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रफुल पटेल यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. तर दुसऱ्याबाजूला बारामतीतील कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची उमेदवारी घोषित कराच म्हणून अजित पवार यांच्या वाहनालाच घेराव घातला. मात्र बराच कालावधी झाला तरी अजित पवार यांनी त्यासंदर्भात घेराव घालणाऱ्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्याने बरेच अंतर कार्यकर्त्ये अजित पवार यांच्या वाहनासोबत चालत होते.

इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज लोकांसमोर आली आहे. हरियाणामध्ये जिलेबी खायची कुणावर वेळ आली आहे हे सिद्ध झाले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केला.

प्रफुल पटेल पुढे बोलताना सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील विचार करता तिथे नॅशनल कॉन्फरन्स पार्टी अनेक वर्षे काम करत आहे. तिथे भाजपा इतर पक्षांचे कमी अस्तित्व आहे आणि दुसर्‍या बाजूला जम्मूमध्ये भाजपा एक नंबरवर आहे. काँग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या जीवावर मिळाल्या आहेत. स्वतःच्या जीवावर जागा मिळवता आलेल्या नाहीत. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले आहे. अनेक घटक नाराज आहेत हा जो प्रचार इंडिया आघाडीने केला होता हे फक्त माध्यमांना हाताशी धरून लोकांची दिशाभूल करत होते हे सिद्ध झाले आहे असा जोरदार टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, मागील दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात प्रगती करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अशा अनेक क्रांतीकारी योजनांमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे कुणाला नाकारता येणार नाही असेही यावेळी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाची माहिती देताना प्रफुल पटेल म्हणाले की, महायुतीमध्ये समन्वय आहे. विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उरलेल्या ज्या जागा आहेत. त्यावर एक-दोन दिवसात बसून योग्य मार्ग काढणार आहोत. महायुतीमध्ये मतभेद आहेत असे विरोधकांकडून चित्र उभे करण्यात येत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. आऊटगोईंग आणि इनकमिंगचा जो विषय आहे. त्यामध्ये काही माणसे इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत काही लोकं इकडेतिकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्याचा अर्थ जनसामान्यांच्या मनात नाराजी आहे असा नाही. स्थानिक स्तरावर काही गणितं बिघडवण्यासाठी इकडे-तिकडे जात असतात. पण आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर आऊटगोईंग आणि इनकमिंग करणारे विचार करतील अशी खात्रीही यावेळी सांगितले.

प्रफुल पटेल बोलताना म्हणाले की, लोकसभेच्यावेळी ईव्हीएम चांगली होती. मोदीसाहेबांचे मताधिक्य कमी झाले त्यावेळी ईव्हीएम चांगली होती आणि आता ईव्हीएम खराब आहे असे दिसू लागले आहे. काश्मीरमध्ये ईव्हीएम बिघाड होऊ शकला असता ना? परंतु असे काही नाही झाले. कधी कधी आपल्याला ही व्यवस्था बरोबर आहे असा विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा विरोधक पराभूत होतात तेव्हा ‘अंगूर खट्टे है’ ही म्हण त्यांना लागू होते असा टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, आपल्या भल्यासाठी कोण काम करत आहे हे लोकांना आता समजले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील एक वर्षात महायुतीने क्रांतीकारी निर्णय घेतले. या निर्णयामुळे नक्कीच प्रत्येक वर्गाला हे आमचं सरकार परत आले पाहिजे असे वाटत आहे असा विश्वासही व्यक्त केला.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शरद पवार यांच्या गटाच्या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्या मनात काहीच संभ्रम नाही. फक्त काही स्थानिक प्रश्न होते त्यावरून काही प्रश्न निर्माण झाले होते, परंतु ते आता अजितदादा व आम्ही सगळे बोलणार आहोत तेव्हा हे प्रश्न सुटतील. निवडणूक कालावधीत प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडामोडी घडत असतात. आता फक्त आऊटगोईंग दिसतेय पण काही दिवसात इनकमिंग सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच यावेळी शेवटी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत असा खुलासाही यावेळी केला.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *