Editor

मोठी बातमीः कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या …

Read More »

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मंत्रालयातील महिला-पुरूष संघास कांस्यपदक संघात मंत्रालय आणि शासकिय कार्यालयीत कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्लीतील कोहात एन्क्लेव्ह १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये खो खो सामने खेळविण्यात आलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा अर्थात शासकिय कर्मचाऱ्यांची खो-खो स्पर्धा २०२३-२४ साठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या खो खो स्पर्धेत दोन्ही संघांनी कांस्य पदकाची कमाई केली. या यशाबद्दल …

Read More »

मुकेश अंबानींना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी ४०० कोटी मागितले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …

Read More »

दिवाळीनिमित्त सूट, १.३२ लाखाची स्कूटर ८६ हजारांना ५००० रूपयांची अतिरिक्त सवलत

इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सवलतीची योजना आणली आहे. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450s स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनी Ather 450s वर ५००० रुपयांची अतिरिक्त सणाची सवलत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ८६०५० रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची मूळ किंमत १.३२ लाख रुपये असली तरी सणासुदीच्या …

Read More »

निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …

Read More »

बंगाल सरकार टाटा मोटर्सला देणार ७६६ कोटींची भरपाई सिंगूरमध्ये कार नॅनो कार उत्पादनासाठी गुंतवणूक केली होती

टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल सरकारकडून नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून व्याजासह ७६६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी लवादाच्या समितीने आपल्या बाजूने निर्णय दिला आहे. टाटा मोटर्सने सोमवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. टाटा मोटर्सने सिंगूर, पश्चिम बंगालमध्ये ऑटोमोबाईल …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रकरण ३१ डिसेंबर जानेवारी पर्यंत संपवा सरन्यायाधीश डि.वाय चंद्रचूड यांनी दिला शेवटचा अल्टीमेटम

महाराष्ट्रातील शिवसेना फुटीप्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ डिसेंबरपर्यंत संपवा. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत संपवा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, सर्वसामान्य मराठा असे करू शकत नाही मराठा शांततेत आंदोलन करा

मराठा आरक्षण प्रश्नी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावित चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने ठोस निर्णय न झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमदारांची घरे जाळण्याचे प्रकार करण्यात आले. तर काही आमदारांच्या …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळणः आमदारांच्या घरांची जाळपोळ तर शिंदे गटाच्या खासदार आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज सोमवारी सकाळी बैठक झाली. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताच तोडगा निघाला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या मराठा आंदोलकांनी मराठवाड्यातील अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी, तर शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर …

Read More »

अशोक चव्हाण यांची मागणी, मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर केली मागणी

राज्य सरकारने राज्यातील सरसकट सर्व मराठा समाजाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मराठा आरक्षण व राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांसंदर्भात आज दुपारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी …

Read More »