राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिलासादायक निर्णय घेत, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्व थकीत मानधन यशस्वीरित्या अदा करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकूण १,१०,६६४ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सुमारे १,०९,६५९ अंगणवाडी सेविका आणि १,०६,७४२ अंगणवाडी मदतनीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची आशा, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून विश्वासनिर्मिती व्हावी पहिल्या टप्प्यात लाखो नागरिकांची प्रलंबित कामे निकाली
राज्यातील नागरिकांना महसूल सेवा सुलभ, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविले जावे. या अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये जनसामान्यांची महत्वपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीदरम्यान दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रालयात झालेल्या …
Read More »संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलविण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार चर्चा महिला आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारचा आग्रह
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीची यंत्रणा म्हणून व्यापकपणे समजले जाणारे एक “अत्यंत महत्त्वाचे” विधेयक सरकार लवकरच आणू शकते, असे संकेत दिल्यानंतर, या महिन्यात संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याच्या शक्यतेवरून गुरुवारी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांमध्ये जोरदार चर्चा झाली. सभा शुक्रवारी होईल का, गुरुवारी अनिश्चित काळासाठी तहकूब केली जाईल का, किंवा अधिसूचित केल्या जाणाऱ्या …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश …
Read More »यूकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी सुरु करण्यासंदर्भात भारतासह ३५ देशांना केले आमंत्रित परराष्ट्र सचिव विक्रम सचिव उपस्थित
युनायटेड किंगडमने (यूके) संघर्षग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बहुपक्षीय चर्चेसाठी भारतासह ३५ देशांना आमंत्रित केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत आहेत. “यूकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर चर्चेसाठी भारतासह अनेक देशांना आमंत्रित केले आहे. …
Read More »आम आदमीने राघव चड्ढा यांना राज्यसभेत उपनेते पदावरून हटवले राघव चढ्ढा यांच्या ठिकाणी अशोक मित्तल यांची नियुक्ती
आम आदमी पार्टीने (आप) गुरुवारी (२ एप्रिल, २०२६) खासदार राघव चड्ढा यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेत पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्यसभा सचिवालयाला एक पत्र सादर केले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात असेही म्हटले आहे की, पंजाबमधून राज्यसभेचे खासदार असलेल्या राघव चड्ढा यांना ‘आप’च्या कोट्यातून सभागृहात …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना गॅसचा पुरवठा
महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला …
Read More »प्रताप सरनाईक यांचा इशारा, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणार
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतूकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या बांद्रा येथील कार्यालयात मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी
निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट जाती, धर्माची मते वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही राज्यात निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केलेल्या एस.आय.आर. मोहिमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाला यातून फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहिम राबवली जात असल्याचे दिसून …
Read More »
Marathi e-Batmya