Editor

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका

दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …

Read More »

छगन भुजबळांनी केले उध्दव ठाकरे यांचे कौतुक, सर्वस्व गमावल्यानंतर सुध्दा… दुसरं कोणी असते तर अंथरूण धरलं असतं

साधारणतः आठ महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्ताही स्थापनही केली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर …

Read More »

एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले

बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री …

Read More »

रामदास कदम यांचा गर्भित इशारा, लंडन, सिंगापूर, श्रीलंका येथील हॉटेल कुणाचे ? याची माहिती… उध्दव ठाकरेंनाही मी आणि योगेशने खोके पोहोचविले पण...

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टीकविण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. मात्र उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार, खोके म्हणून टीका करत आहेत. परंतु होय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला खोके दिले पण ते मिठाईचे खोके दिले. पण मी आणि आमदार योगेश कदम यांनी जे खोके मातोश्रीवर आणून दिले ते …

Read More »

रामदास कदमांची भास्कर जाधवांवर शिवराळ भाषेत टीका तर अंबादास दानवेंना थेट धमकीच उत्तर सभेआधीच रामदास कदमांची ठाकरे गटावर टीका

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, रामदास कदम, उदय सामंत यांच्यावर खोचक टीकाही केली. या टीकेला प्रत्युत्तर याच गोळीबार मैदानावर देणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहिर केले. तत्पूर्वीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम …

Read More »

नाना पटोलेंची टीका, त्यामुळे घाबरलेले पंतप्रधान मोदी पोलिसांना पुढे करतायत… काँग्रेस पक्ष अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच

उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुल गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महाघोटाळ्या विरोधात …

Read More »

राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल …

Read More »

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …

Read More »

श्रीनगरमधील त्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींची दिल्ली पोलिसांकडून २ तास चौकशी बलात्कार पिडीतांवरील वक्तव्याची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिस सकाळपासून राहुल गांधींच्या घरी

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा श्रीनगर मध्ये पोहोचली. या यात्रे दरम्यान, अनेक व्यक्ती, तरूण आणि मुली-महिला राहुल गांधी यांना भेटत होत्या. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची, संकटाची, अडचणींची माहिती देत होत्या. भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर श्रीनगर येथे झालेल्या जाहिर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रे …

Read More »

अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या चिखलातः जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना बसला फटका निसर्ग कोपलाः गारपीठाचा मारा, शेतकरी झाला हवालदिल

शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या …

Read More »