पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरीबांना दिलेले दहा टक्के आरक्षण वैध ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली. या आरक्षणामुळे राज्यातील मराठा आणि अल्पसंख्यांकासह विविध समुदायातील गरीबांना लाभ होत असून पंतप्रधान मोदी हे गरीबांचे तारणहार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, …
Read More »आर्थिक दुर्बल घटकांना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा दिलासाः आरक्षण वैध
केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्याच्या उद्देशाने १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याविषयीचा कायदा संसदेत मंजूरही केला. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या आदेशानुसार ५० टक्के अधिकचे आरक्षण देता येत नाही. मात्र हे आरक्षण देताना मोदी सरकारने १०३ व्या घटना दुरुस्ती केली. त्यास सर्वोच्च न्यायालयात …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ठाण्यात नवी चित्रनगरी
मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री …
Read More »राहुल गांधी सोमवारी संध्याकाळी नांदेडमध्ये: वडील भारत छोडो तर मुलगा भारत जोडोत
केरळपासून सुरु झालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा त्यांच्या नियोजित वेळेनुसार उद्या सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचत आहे. भारत जोडो यात्रा नांदेडमधील देगलूर येथे पोहचल्यानंतर यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण …
Read More »सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री पुन्हा असामान्य ? सीएमओत जाण्यासाठी मंत्रालयाची वेळ
साधारणत: तीन महिन्यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहेत असे सांगत कोणीतीही अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या अडी-अडचणी ऐकून घेत आणि त्यावर तात्काळ फोन करून पुढील आदेश देत असत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी …
Read More »‘अभ्यासक्रम सुचवा’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण …
Read More »निकालानंतर आशिष शेलारांनी लटकेंचे अभिनंदन करत म्हणाले, तर पराभव निश्चित होता
स्व.रमेश लटके यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेकरीता झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. अपेक्षेनुसार या निव़डणूकीत ऋतुजा लटके यांचा ६५ हजारहून अधिक मते मिळवित विजय झाला. या निकालानंतर भाजपा नेते तथा मुंबई …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या विजयानंतर ऋतुजा लटके मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट-भाजपा आणि उध्दव ठाकरे गटातील पहिली लिटमस टेस्ट अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पार पडली. या निवडणूकीत ६५ हजार मतांनी विजय मिळविल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार ऋतुजा लटके या मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी उध्दव …
Read More »विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया: नोटाची मते भाजपाचीच…
शिवसेनेचे आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा ६५ हजार मतांनी दणदणीत विजय झाला. मात्र या निवडणूकीत नोटाखाली मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. त्यामुळे लटके यांच्यानंतर दोन नंबरची मते नोटाला मिळाली आहेत. …
Read More »भाजपा म्हणते, लटकेंचा विजय निश्चित होता त्यात नव्याने सांगण्यासारखे काही नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच रोज त्या पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. त्यांची यात्रा नेत्यांनी ताब्यात घेतली असून ती सामान्य कार्यकर्त्यांसाठी किंवा जनतेसाठी नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केली. ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या दरम्यान त्यांनी मीरा …
Read More »
Marathi e-Batmya