Editor

शिवसेनेचे प्रत्युत्तर, नवनीत राणा जरा तोंड सांभाळून……कोण आहात आपण ? शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणा याना फटकारले

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नवनीत राणा जरा तोंड सांभाळून…… कोण आहात आपण “सी”‘ ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या…. एक आमदार आपल्यावर भाळला आणि …

Read More »

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात दिले मृत्यूचे ‘हे’ कारण पाठीमागच्या सीट बेल्टचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मिस्त्री यांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्राबरोबरच राजकिय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालातील काही माहिती उघडकीस येत असून या …

Read More »

खासदार गिरिश बापट यांचा घरचा आहेर; सत्तेसाठी पक्षनिष्ठा, वैचारीक बासनात… भाजपावरच केला वार

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपाही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या …

Read More »

अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर

सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत निवडणूकी आधी मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मते मागितली. निकाल हाती आल्यानंतर मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचाही आरोप केला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा केली. तसेच …

Read More »

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मुंबईतील एक तर बीडमधील दोन शिक्षकांना राष्ट्रपतींकडून प्रदान

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील …

Read More »

गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …

Read More »

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपानेच केले वॉक आऊट विश्वासमत ठराव जिंकत केला विजय साजरा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार भाजपाकडून पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे मुख्यमंत्री सोरेन हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून एकदा सहलीवर गेले तर नुकतेच विश्वासमत दर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी पंचतारांकित हॉटेलची टूर केली. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत तो सोरेन …

Read More »

अमित शाह यांचा लालबाग आणि वांद्रे गणपती दर्शन दौरा सरकारी का खाजगी? लालबाग राजाच्या दर्शन आणि आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाच्या दर्शनाची माहिती व जनसंपर्क विभागाकडून बातमी

देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले. मात्र शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे खाजगी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय नेते किंवा राज्यातील मंत्र्याच्या दौऱ्याचे कोणतेही वृत्त अर्थात बातमी शासकिय विभागाकडून जारी करायचे नाही असे संकेत आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांचे भाजपाच्या पाठिब्यांवर असलेले सरकार अस्तित्वात आहे. मात्र या शासकिय …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा.. अभी नही तो कभी नही अशा आवेशात लढा

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि आमदारांसमोर बोलताना उध्दव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमिन दाखविण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत म्हणाले, ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता …

Read More »

नाना पटोले म्हणाले, अमित शहा यांना गणराया देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा!: जितु पटवारी

सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी …

Read More »