Editor

लवासा प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात मागितली दाद मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल

लवासा या बहुचर्चित खाजगी हिल स्टेशनच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने या हिल स्टेशनच्याबाबत पवार कुटुंबियांच्या अधिकारावरून काही ताशेरे ओढले. मात्र त्यासंदर्भात कोणतेही गुन्हे नोंदविण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात नाशिकस्थित नानासाहेब जाधव यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या नादी लागण्याचा कोणी स्वप्नातही प्रयत्न करू नये… मुख्यमंत्री शिंदे सह बंडखोरांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार अस्तित्वात येऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप या दोघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकरला लक्ष्य केलं असतानाच दुसरीकडे संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा करत पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानुसार रखडलेले पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सहा दिवस कामकाज होणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेले नियोजित १७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. त्यातच शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची एकमेकांच्या विरोधात सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरु आहे. त्यावर अंतिम निकाल …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही समाजाला काय मिळाले? जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही

देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे २७ टक्के आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली पण हे आरक्षणही आज धोक्यात आल्याचे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत तरिही ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही. आज पंतप्रधानपदावर ओबीसी समाजाचा व्यक्ती असूनही ८ वर्षात समाजाला …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आणि शिंदे गटातील या संभावित चेहऱ्यांना मिळणार संधी आणि खाती भाजपामधून १५ तर शिंदे गटातून १० जणांचा समावेश राहणार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेनेचा वारससह कोण पात्र-अपात्र या मुद्यावरून न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरु आहे. या मंत्रिमंडळात भाजपाकडून १५ तर शिंदे गटाकडून १० जणांची नावे अंतिम करण्यात आली …

Read More »

विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी सकाळी ११ वाजता राजभवनात: २० ते २५ जणांचा समावेश? राज्यपाल भवन, राज शिष्टाचार विभाग इन रेडी पोझिशन

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंडखोरी करत शिवसेनेवर दावा केला. तसेच उध्दव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर पुन्हा उध्दव ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र कायदेशीर बाबी सुरु असतानाही राज्य मंत्रिमंडळाचा …

Read More »

कट्टर हिंदूत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरम सणाच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी २०-२५ जणांचा होणार शपथविधी

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि भाजपाकडून हे सरकार हिंदूत्ववादी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हिंदूत्वावादी सरकारकडून एक महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिंदू सणाच्या किंवा हिंदू शुभ दिवशी होणे अपेक्षित …

Read More »

विधिमंडळ अधिवेशन होणारः मंगळवारी उद्याच्या बैठकीत ठरणार तारीख कामकाज सल्लागार समितीची उद्या दुपारी होणार बैठक

राज्यात सत्तांतर होवून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे नियमित पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक उद्या बोलाविण्यात …

Read More »

राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा

येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मला कळत नाही अशा बातम्या बाहेर कशा येतात अलिप्त राहिलेले जयंत पाटील झाले पुन्हा सक्रिय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गायब झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून ते …

Read More »