Editor

रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल विभागाचे दोन अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार झाले नियुक्त

रत्नागिरी जिल्ह्यामधील महसूल विभागातील दोन अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणचे तहसिलदार जयराम सुर्यवंशी यांची ओएसडी म्हणून नियुक्ती करून घेतली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ओएसडी म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांना तर शालेय …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, तथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न

काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला. परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्वाची पदे दिली पण आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने व गांधी कुटुंबाने …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता तर अर्धा सोडा… माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ प्रकल्पावरून जोरदार राजकारण रंगलं होतं. या मेट्रोसाठी कारशेड आरेमध्ये करावी की कांजूरमार्गमध्ये यावरून मोठा वाद झाल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेली. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबलं होतं. अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या. अखेर आज मेट्रो ३ …

Read More »

असा रंगला अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीनचा सोहळा चार वयोगटातील महिलांना विजेते पद

स्त्रियांशी निगडीत उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या अनाहत इव्हेंट्सने आयोजित केलेल्या ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन’ चा किताब वेगवेगळ्या वयोगटातील सुषमा बेर्डे, मैथिली आंगचेकर, शर्विता शिंपी, तेजश्री हडवळे – मोरे यांनी पटकावला. ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन २०२२’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी वाशीतील इम्पेरिअल बँक्वेट येथे दिमाखात पार पडली. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या चारही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फलंदाजीला पूर्ण वेळ नाही कमी चेंडूत जास्त धावा… सरकारी काम सहा महिने थांब असं करायचे नाही

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक मैलाचा दगड ठरणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गावरील मेट्रो प्रोचटोटाईप चाचणीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णयः गुजरात दंगलीचे १० खटले बंद नवे सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीशी संबधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दाखल केलेल्या याचिकेसह सर्व याचिकांवरील सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. गुजरात दंगलीप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह जवळपास दहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी आता सुनावणी घेणे निष्फळ अयोध्या जमिन वाटप खटल्याचा संदर्भ देत खटले बंद कऱण्याचा निर्णय

१९९२ साली बाबरी मस्जिदीचे संरक्षण कऱण्याची हमी देऊनही मस्जिदीचे संरक्षण केले नसल्याने न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. या याचिकेवरील सुनावणी घेणे निष्फळ असल्याचे सांगत हा खटला आता बंद करण्यात येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या संजय किशन कौल आणि अभय एस ओक यांच्या दोन …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, या सरकारला वठणीवर आणायला हवे… हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार...

महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील …

Read More »

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल भाजपाचे मोहित कंबोज यांची तक्रार

आपल्या धडाकेबाज शैलीने आणि वक्तव्याने चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्य राज्याच्या अध्यक्षा माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका केल्याने गुन्हा दाखल करण्यात आहे. विद्या चव्हाण यांनी एका खाजगी वृत वाहिनीवर बोलताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, …

Read More »

शरद पवार म्हणाले, जेथे सत्ता नाही तेथे सत्तेपासून दूर करणे हाच उपक्रम… केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरून साधला निशाणा

देशातील विविध राज्यांमधील राजकिय नेत्यांच्या विरोधात सध्या कधी सीबीआयकडून तर कधी ईडीकडून तर कधी आयकर विभागाकडून धाडी टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने सतत काहीना काही कारणातून कुणावर …

Read More »