Editor

देवेंद्र फडणवीस आजारी असल्याचे कळताच संजय राऊत यांनी केले “हे” ट्विट फडणवीसांना कोरोनाची लागण

भाजपाच्या हाता तोंडाशी असलेल्या सत्तेचा घास काढून घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. त्यातच संजय राऊत यांच्या टीकेमुळे तर दस्तुरखुद्द भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने …

Read More »

घराणेशाहीवरून काँग्रेसने दाखविला पंतप्रधान मोदी यांना आरसा मोदींना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देत दाखविला आरसा

२०१४ सालापासून काँग्रेसवर घराणेशाहीवरून गांधी घराण्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र यावेळी काँग्रेसने एका वृत्ताचा हवाला देत भाजपामधील २५ टक्के उमेदवार हे कसे घराणेशाहीतून आल्याचा आरसा दाखवित त्या घराणेशाहीबाबतचे उत्तर द्या अशी मागणीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका ट्विटद्वारे …

Read More »

केंद्राकडून नुकसान भरपाई बंद होणार, मविआला चिंता तुटीची रक्कम आणायची कोठून? १ जुलैपासून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होणार

एक देश एक कर या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजीपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ जुलै २०२२ रोजी पासून या जीएसटी कराच्या बदल्यात राज्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारी महिन्याकाठची …

Read More »

आरोग्य विभागाचे सर्व आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; काय आहे पत्रात? वाचा आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची  संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, …

Read More »

उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त …

Read More »

संजय राऊत म्हणाले, दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील… भाजपाने विरोधी म्हणून तयारी करावी

परंतु त्यांची (भाजपा) जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते हे दाखवून द्यायचे होते. तसेच हे …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी शिवस्वराज्य दिन “अशा” पध्दतीने साजरा होणार राज्यात ६ जून "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा

राज्यात सोमवार ६ जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्तीवरून केला “हा” खुलासा मस्ट म्हणजे बंधनकारक नव्हे तर ते आवाहन म्हणूनच घ्या

राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर लगेच राज्याच्या आरोग्य विभागाने एक परिपत्रक काढत बंदिस्त असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद केले. यावरून संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला …

Read More »

प्रदूषण रोखूया.. चला ‘ईव्ही’ वापरूया वातावरणीय बदल आणि पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर खास लेख

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या प्रयत्नांना हातभार लावूया… वातावरणीय बदलांचे गंभीर परिणाम आता जगभरातील नागरिक अनुभवत आहेत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी …

Read More »